AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: वास्तू दोषामुळेही वाढते कर्ज!; कर्जमुक्त होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

कोणालाच कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचे नसते, परंतु अनेकवेळा अशी परिस्थिती येते की, त्यांना कर्ज घ्यावे लागते. वाढत्या कर्जामुळे व्यक्ती मानसिक तणावातही राहू लागतो. कधी कधी कर्जाचा बोजा इतका वाढतो (Debt increases due to Vastu dosh) की, काय करावे हेच समजत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या समस्येचे कारण तुमच्या घरातील वास्तू दोष (Vastu dosh) देखील असू शकतो. […]

Vastu Tips: वास्तू दोषामुळेही वाढते कर्ज!; कर्जमुक्त होण्यासाठी करा 'हे' उपाय
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 13, 2022 | 9:47 AM
Share

कोणालाच कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहायचे नसते, परंतु अनेकवेळा अशी परिस्थिती येते की, त्यांना कर्ज घ्यावे लागते. वाढत्या कर्जामुळे व्यक्ती मानसिक तणावातही राहू लागतो. कधी कधी कर्जाचा बोजा इतका वाढतो (Debt increases due to Vastu dosh) की, काय करावे हेच समजत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या समस्येचे कारण तुमच्या घरातील वास्तू दोष (Vastu dosh) देखील असू शकतो. घरातील वास्तू योग्य नसल्यास सर्व प्रकारच्या समस्या वाढू लागतात. वास्तूनुसार जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे (Vastu Tips) कर्ज वाढते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला वास्तुदोष असल्यास कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते. यामुळे माणूस विनाकारण कर्जाच्या कचाट्यात अडकतो. घराच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) मध्ये वास्तुदोष असल्यास खर्च इतका वाढतो की, कर्ज फेडणे कठीण होते. कधी कधी तर सर्वस्वसुद्धा पणाला लागते.

दुसरीकडे घराच्या ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर चुकीच्या मार्गदर्शनामुळे घराचा प्रमुख कर्जात अडकतो. उत्तर दिशेला वास्तुदोष असल्यामुळे शेअर बाजार, जुगार, सट्टा, लॉटरी यातून पैसे कमावण्याच्या लोभापोटी अनेकजण विनाकारण कर्जबाजारी होतात.

वास्तूनुसार घराच्या प्रमुखाची बेडरूम पश्चिम दिशेला असेल तर व्यवसायात नुकसान होते, त्यामुळे कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते.

कर्जापासून मुक्त होण्याचे मार्ग

वास्तूनुसार बाथरूम घराच्या नैऋत्य भागात नसावे. असे म्हटले जाते की या दिशेला स्नानगृह असल्यास कर्जात बुडून जाऊ शकते. नैऋत्य दिशेला स्नानगृह बांधले असेल तर त्याच्या कोपऱ्यात मीठाने भरलेली वाटी ठेवावी. यामुळे वास्तुदोष दूर होतात.

काही लोक जेवण झाल्यावर बऱ्याचवेळ भांडी खरकटी ठेवतात. वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे धनहानी होते आणि कर्जाबरोबर गरिबीही वाढते, असे म्हणतात.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमचे कर्ज  घेतले असेल, तर त्याचा पहिला हप्ता मंगळवारी भरावा. असे केल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते.

घराच्या भीतीवर काळे डाग,रेघोट्या आणि अस्वच्छता नसावी यामुळे कर्ज वाढते. घरच्या भिंती कायम स्वच्छ असाव्या. भिंतींचा रंग खराब झाला असल्यास नवीन रंग मारावा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन