AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमावलेला पैसा हातात टिकत नाही? तुमच्या घरातली एक चूक ठरते कारणीभूत

घरातील पायऱ्यांवर बसण्याची सवय तुम्हाला महागात पडू शकते. वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांवर बसल्याने आर्थिक प्रगतीत कसे अडथळे येतात आणि कौटुंबिक शांतता कशी भंग होते, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

कमावलेला पैसा हातात टिकत नाही? तुमच्या घरातली एक चूक ठरते कारणीभूत
money
| Updated on: May 18, 2026 | 3:12 PM
Share

ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचा आणि जागेचा तिथल्या सदस्यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. अनेकदा लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या किंवा स्वयंपाकघराच्या वास्तूवर विशेष लक्ष देतात, परंतु जिना म्हणजेच घरातील पायऱ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. काही लोक तर वेळ मिळाल्यानंतर घरातील पायऱ्यांवर बसून तासनतास गप्पा मारण्याची सवय असते. पण, वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांवर बसणे योग्य आहे का? याविषयी वास्तुतज्ज्ञ काय सांगतात, याबद्दल जाणून घेऊया.

नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो

वास्तुशास्त्रानुसार, घरातील पायऱ्यांवर वारंवार बसल्याने घरात येणारी सकारात्मक ऊर्जा रोखली जाते. यामुळे वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. परिणामी, घरात विनाकारण तणाव, चिंता आणि चिडचिडेपणाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे शक्यतो पायऱ्यांवर बसणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे

घराच्या प्रगतीमध्ये आणि समृद्धीमध्ये जिन्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पायऱ्यांवर वारंवार बसल्याने घराच्या आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. अशा वास्तूदोषामुळे व्यक्तीने कितीही पैसे कमवले, तरी हातात पैसा टिकत नाही. त्यामुळे खर्चाचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढू लागते.

कौटुंबिक संबंधांवर आणि आरोग्यावर परिणाम

पायऱ्यांवर सतत बसण्याच्या सवयीमुळे घरातील ऊर्जेचे संतुलन बिघडते, ज्याचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर होतो. यामुळे घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद आणि मतभेद वाढू शकतात. तसेच, मनात सतत जडपणा जाणवणे, आरोग्याच्या तक्रारी उद्भवणे आणि मानसिक शांतता लाभण्यात अडचणी येणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या चुकाही टाळा

वास्तुतज्ज्ञांच्या मते, केवळ पायऱ्यांवर बसणेच नव्हे, तर त्यांच्याशी संबंधित इतर काही चुका देखील घरात दोष निर्माण करू शकतात. पायऱ्यांखाली कधीही देवघर, स्वयंपाकघर किंवा तिजोरी बनवू नये. तसेच तिथे कचरा किंवा चपला-बूट ठेवणे टाळावे. जिना नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावा. जर तुमच्या घरात असा वास्तूदोष असेल किंवा नकळत पायऱ्यांवर बसण्याची सवय झाली असेल, तर ती आजच बदला. पायऱ्यांचा योग्य मान राखल्यास घरात सुख-शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?