AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: घरातल्या ईशान्य दिशेला वास्तुशास्त्रात आहे विशेष महत्त्व, या नियमाचे पालन केल्यास होईल भरभराट

घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मी वास करेल. ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही या दिशेचा उपयोग केवळ मंदिर किंवा पूजेसाठी केला जातो.

Vastu Tips: घरातल्या ईशान्य दिशेला वास्तुशास्त्रात आहे विशेष महत्त्व, या नियमाचे पालन केल्यास होईल भरभराट
वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 30, 2022 | 10:51 AM
Share

वास्तुशास्त्रात, (Vastu Tips) निर्देशानुसार पालन केल्याने नेहमी इच्छित परिणाम मिळतात. आज उत्तर-पूर्व दिशेबद्दल जाणून घेऊया. उत्तर आणि पूर्व यांमधील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोन म्हणतात. ही दिशा-क्षेत्र कोणत्याही वास्तूचे सर्वात पवित्र स्थान आहे. ज्यामध्ये देवाचा निवास असतो. वास्तूशास्त्राच्या (Vastushastra) नियमानुसार, घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मी वास करेल. ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही या दिशेचा उपयोग केवळ मंदिर किंवा पूजेसाठी केला जातो. वास्तूनुसार या स्थानासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

वास्तूनुसार,  घराच्या ईशान्य कोपर्‍यात कोणतीही जड वस्तू ठेवू नये. असे मानले जाते की जर तुम्ही या ठिकाणी एखादी जड वस्तू ठेवली तर सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो, ज्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी जड कपाट, स्टोअर रूम इत्यादी करणे टाळा.

घराची ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते आणि येथे देवाचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी कधीही चपला जोडे  किंवा कचरा पेटी ठेऊ नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि समस्या निर्माण होऊ लागतात.

घराच्या ईशान्य कोपऱ्यात शौचालय नसावे. असे केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. पॆशांची बचत होत नाही. नवविवाहित जोडप्याची बेडरूम घराच्या ईशान्य कोपऱ्यात बनवू नये. असे केल्याने परस्पर संबंधात दुरावा येतो आणि अनावश्यक समस्या वाढू लागतात.

या गोष्टी अवश्य करा

जर तुम्हाला घराचे सुख हवे असेल तर घराच्या ईशान्य कोपर्‍यात देवघर बनवावे. या ठिकाणी केलेली पूजा नेहमी देवाला मान्य असते आणि यामुळे घरातील सुख-समृद्धीही कायम राहते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या दिशेचा परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा राहणार नाही. विहीर, बोअरिंग, मटका किंवा पिण्याचे पाणी यासारख्या कोणत्याही जलस्रोतासाठी हे ठिकाण नेहमीच उत्तम असते. जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घराच्या या कोपऱ्यात बोरिंग खोदा किंवा जमिनीखाली पाण्याची टाकी बनवा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.