AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: घरातल्या ईशान्य दिशेला वास्तुशास्त्रात आहे विशेष महत्त्व, या नियमाचे पालन केल्यास होईल भरभराट

घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मी वास करेल. ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही या दिशेचा उपयोग केवळ मंदिर किंवा पूजेसाठी केला जातो.

Vastu Tips: घरातल्या ईशान्य दिशेला वास्तुशास्त्रात आहे विशेष महत्त्व, या नियमाचे पालन केल्यास होईल भरभराट
वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 30, 2022 | 10:51 AM
Share

वास्तुशास्त्रात, (Vastu Tips) निर्देशानुसार पालन केल्याने नेहमी इच्छित परिणाम मिळतात. आज उत्तर-पूर्व दिशेबद्दल जाणून घेऊया. उत्तर आणि पूर्व यांमधील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोन म्हणतात. ही दिशा-क्षेत्र कोणत्याही वास्तूचे सर्वात पवित्र स्थान आहे. ज्यामध्ये देवाचा निवास असतो. वास्तूशास्त्राच्या (Vastushastra) नियमानुसार, घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मी वास करेल. ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही या दिशेचा उपयोग केवळ मंदिर किंवा पूजेसाठी केला जातो. वास्तूनुसार या स्थानासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

वास्तूनुसार,  घराच्या ईशान्य कोपर्‍यात कोणतीही जड वस्तू ठेवू नये. असे मानले जाते की जर तुम्ही या ठिकाणी एखादी जड वस्तू ठेवली तर सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो, ज्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी जड कपाट, स्टोअर रूम इत्यादी करणे टाळा.

घराची ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते आणि येथे देवाचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी कधीही चपला जोडे  किंवा कचरा पेटी ठेऊ नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि समस्या निर्माण होऊ लागतात.

घराच्या ईशान्य कोपऱ्यात शौचालय नसावे. असे केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. पॆशांची बचत होत नाही. नवविवाहित जोडप्याची बेडरूम घराच्या ईशान्य कोपऱ्यात बनवू नये. असे केल्याने परस्पर संबंधात दुरावा येतो आणि अनावश्यक समस्या वाढू लागतात.

या गोष्टी अवश्य करा

जर तुम्हाला घराचे सुख हवे असेल तर घराच्या ईशान्य कोपर्‍यात देवघर बनवावे. या ठिकाणी केलेली पूजा नेहमी देवाला मान्य असते आणि यामुळे घरातील सुख-समृद्धीही कायम राहते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या दिशेचा परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा राहणार नाही. विहीर, बोअरिंग, मटका किंवा पिण्याचे पाणी यासारख्या कोणत्याही जलस्रोतासाठी हे ठिकाण नेहमीच उत्तम असते. जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घराच्या या कोपऱ्यात बोरिंग खोदा किंवा जमिनीखाली पाण्याची टाकी बनवा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू