AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : हातात पैसै टिकत नाही? मग शुक्रवारी करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही

अनेकदा असं होतं की आपण प्रचंड पैसा कमावतो, परंतु तो आपल्या हातात टिकत नाही, त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

Vastushastra : हातात पैसै टिकत नाही? मग शुक्रवारी करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 9:34 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये. तर घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करावेत? त्यासाठी काय उपाय आहेत? याची देखील माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपण प्रचंड कष्ट करतो, मेहनत करून पैसा कमावतो. परंतु तो पैसा आपल्या हातात टिकत नाही. जसा आपल्या हातात पैसा येतो तसा तो खर्च होतो. मग असं का होतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुमच्या हातात पैसा टिकत नाही, याचा अर्थ तुमचं आर्थिक नियोजन कुठेतरी चुकतं आहे, असा देखील होऊ शकतो. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुम्हाला आर्थिक समस्या येण्यास सुरुवात होते. तुमच्यासमोर असे काही आर्थिक संकटं निर्माण होतात, ज्यामुळे तुमचं बँक बॅलन्स कमी होतं. हातात पैसा टिकत नाही. आज आपण वास्तुशास्त्रामधील असा एक उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी हळुहळु दूर होऊन, तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल.

शुक्रवारी करायचा उपाय – शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार असतो. लक्ष्मी माता ही धनाची देवता आहे, त्यामुळे शुक्रवारला हिंदू धर्मशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. तुम्ही दर शुक्रवारी पहाटे लवकर झोपेतून उठा, स्नान करून लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करा. तुमच्या देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो हा असायलाच हवा. लक्ष्मी मातेला तुम्ही पिवळं झेंडूच किंवा लाल जास्वंदाचं फूल वाहू शकतात. तसेच लक्ष्मी मातेला पुजेनंतर फळाचा नवैद्य अर्पण करावा. लक्ष्मी मातेची आरती करावी. जर तुम्ही दर शुक्रवारी हा उपाय केल्यास नक्कीच तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

इतर काही उपाय – या उपायासोबतच वास्तुशास्त्रात धनप्राप्तीचे इतर देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत. जसं की तुमच्या घराचं जे अंगण असतं, त्याचा बरोबर मध्य भाग ज्याला आप ब्रह्मस्थान म्हणतो, ते नेहमी स्वच्छ ठेवावं. ब्रह्मस्थानावर कधीही अडागळीचं सामान किंवा टाकाऊ वस्तू, जड वस्तू ठेवू नये. यामुळे धनप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुमच्या घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेरांची दिशा असते, तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला असलेल्या भिंतीला कुबेरांचा फोटो देखील लावू शकतात. त्यामुळे तुमच्या धन प्राप्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली