AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vat Purnima 2025: वट पौर्णिमेची पूजा कशी करावी? व्रत कसे करावे? जाणून घ्या

Vat Purnima 2025: ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. वटपौर्णिमेची व्रतकथा पाहुया तसेच तिथी, शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्व काय आहे, हे जाणून घ्या.

Vat Purnima 2025: वट पौर्णिमेची पूजा कशी करावी? व्रत कसे करावे? जाणून घ्या
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 10, 2025 | 11:04 AM
Share

ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. असे मानले जाते की विवाहित स्त्रिया या दिवशी भगवान ब्रह्मा, सावित्री, यम, नारद आणि सत्यवान यांची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी पतीचा आशीर्वाद मिळावा. या दिवशी पूजेच्या वेळी उपवास केला जातो. वटपौर्णिमेची व्रतकथा पाहुया.

वट पौर्णिमा व्रत कथा वट पौर्णिमेच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी सावित्री ही मद्रादेशचा राजा अश्वपती यांची कन्या होती. राजकुमारी सावित्री अत्यंत बुद्धिमान, धाडसी आणि पवित्र होती. तपस्वी जीवन जगणाऱ्या सत्यवानाची तिने पती म्हणून निवड केली. परंतु नारद मुनींनी सावित्रीला सांगितले की, सत्यवान अल्पजीवी आहे आणि एका वर्षाच्या आत मरणार आहे. हे कळल्यानंतरही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि सत्यवानाशी विवाह केला.

सावित्री आपल्या पतीसोबत जंगलात राहू लागली. एके दिवशी सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आला तेव्हा सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला आणि तिथेच पडला. यमराज त्यांचा आत्मा घ्यायला आले, पण सावित्रीने यमराजाचे अनुकरण केले आणि त्यांच्याशी धर्माविषयी बोलून त्यांचे मन जिंकले. सावित्रीची पतीवरील भक्ती आणि प्रेम पाहून यमराजाने तिला तीन वरदान मागण्याची आज्ञा केली.

सावित्रीने प्रथम सासरचे हरवलेले राज्य परत मागितले, दुसरे शंभर पुत्रांचे वरदान मागितले आणि तिसऱ्या वरदानात सत्यवानाचे प्राण मागितले. यमराज आपल्या वचनाला बांधील होते, म्हणून त्यांनी सत्यवानाला जीवनदान दिले. अशा प्रकारे सावित्रीच्या बुद्धीने, प्रेमाने आणि समर्पणाने सत्यवानाला नवं आयुष्य मिळालं. तेव्हापासून स्त्रिया या दिवशी उपवास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

वट पौर्णिमा शुभ मुहूर्त वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त: सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 पर्यंत या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे.

वटपौर्णिमा व्रत कसे करावे? वटपौर्णिमेच्या दिवशी अनेकजणी निर्जल व्रत ठेवतात. तर काहीजणी एकभुक्त राहून व्रत करतात. हिंदू रितीनुसार यादिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा, वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा. तसेच काहीजणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....