AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? पहा प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं?

प्रेमानंद महाराज यांची प्रवचनं ऐकण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त मोठी गर्दी करत असतात. सहज, सोप्या आणि समजेल अशा भाषेत लोकांना उपदेश करणं हे प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनाचं वैशिष्ट्य आहे. मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? यावर बोलताना प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं? त्याबद्दल जाणून घेऊयात.

मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? पहा प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं?
प्रेमानंद महाराज Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2025 | 7:34 PM
Share

प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांची प्रवचन ऐकण्यासाठी देशभरातून भक्त मोठ्या प्रमाणात वृंदावनमध्ये गर्दी करत असतात. प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनादरम्यान त्यांचे भक्त त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि महाराज देखील त्या प्रश्नांची उत्तर देऊन आपल्या भक्तांचे समाधन करतात.असंच एकदा प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना एका तरुणाने त्यांना प्रश्न विचारला, हे कलीयुग आहे, तर कलीयुगामध्ये असं काय करावं ज्यामुळे मोक्ष मिळेल, सर्व प्रकारच्या पापांपासून मला मुक्ती मिळेल? यावर प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं आहे? ते जाणून घेऊयात.

प्रेमानंद महाराज म्हणतात की, एका छोट्याशा दिव्यामध्ये कापसाचा संपूर्ण डोंगर जाळून टाकण्याची शक्ती आहे, त्याचप्रमाणे ईश्वरामध्ये देखील तुमची संपूर्ण पापे नष्ट करण्याची शक्ती आहे, पण त्यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे तुम्ही स्वत: देवाला समर्पित झालं पाहिजे. प्रेमानंद महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गितेमध्ये सांगितलं आहे की, सर्व कर्म, धर्म, असक्ती सोडून द्या आणि मला शरण या, त्याचप्रमाणे तुम्ही जर भगवान श्रीकृष्ण यांना शरण गेले तर तुम्हाला सर्व पापातून मुक्ती मिळेल. तुमचा उद्धार होईल. असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.

प्रेमानंद महाराज पुढे असंही म्हणतात जो इश्वराला शरण जातो, त्याचा उद्धार होतो. मात्र त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचा मोह, माया त्यागली पाहिजे. तुमची नक्कीच सर्व पापांमधून मुक्त्तता होईल, तुम्हाला जर शांती हवी असेल तर ईश्वराला शरण जा, असा सल्ला प्रेमानंद महाराज यांनी आपल्या भक्तांना दिला आहे. प्रेमानंद महाराज यांची प्रवचनं जग प्रसिद्ध आहेत. जगभरात त्याचे भक्त आहेत. प्रेमानंद महाराज नेहमीच आपल्या भक्तांना प्रवचनांच्या माध्यमातून उपदेश करत असतात. ते आपल्या प्रवचनामधून भक्तांना भक्ती मार्गाचं महत्त्व सांगतात. ईश्वराला शरण जा, सर्व पापांमधून मुक्ती मिळेल असं प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.