AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…

अनेक जण रक्षाबंधननंतर लगेचच राखी काढतात पण, लगेच राखी सोडणं योग्य मानलं जात नाही. तर रक्षाबंधन झाल्यानंतर राखी सोडण्याचे काय नियम सांगण्यात आले आहेत, जाणून घ्या...

रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं...
| Updated on: Aug 30, 2026 | 3:18 PM
Share

रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला कायम तिचं संरक्षण करण्याचं वचन देतो. पण रक्षाबंधन झाल्यानंतर राखी कधी सोडायची याबद्दल फार कोणाला माहिती नसेल, राखी सोडण्याचे देखील काही नियम आहेत. सांगायचं झालं तर, रक्षाबंधनचा पवित्र सण 28 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात साजरा करण्यात आला. या दिवशी, बहिणी शुभ मुहूर्तावर आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी व सुखासाठी प्रार्थना करतात. राखी बांधताना जे नियम पाळले जातात, तसेच राखी सोडण्याचे देखील नियम आहेत. तर त्या नियमांबद्दल शास्त्रात काय सांगण्यात आलं आहे जाणून घ्या. सण संपताच राखी अचानक किंवा निष्काळजीपणे तोडू नये, तर काही कालावधीनंतर ती विधीपूर्वक काढली पाहिजे.

धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधननंतर लगेच राखी काढणं अशुभ मानलं जातं. रक्षाबंधन झाल्याननंतर किमान 24 तासांनीच राखी कढणं योग्य असतं. साधारणपणे, मनगटावर काही दिवस राखी बांधून ठेवणं शुभ मानलं जातं. काही भागांमध्ये आणि कुटुंबांमध्ये, रक्षाबंधनानंतर 3 ते 5 दिवस मनगटावर राखी ठेवण्याची परंपरा आहे, त्यानंतर ती काढता येते. इतर प्रचलित समजुतींनुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमीपर्यंत राखी बांधून ठेवावी आणि जन्माष्टमीच्या दिवशी पूजा-अर्चा केल्यानंतरच ती मनगटावरून काढणे सर्वोत्तम मानलं जातं.

राखी काढल्यानंतरही काही पवित्र गोष्टींचे पालन करणं अत्यावश्यक आहे. राखी कधीही कचरापेटीत किंवा घाणेरड्या जागी फेकू नका. राखी हा केवळ एक धागा नसून एक पवित्र ‘रक्षासूत्र’ आहे आणि त्याला दैवी महत्त्व आहे. म्हणून, काढलेली राखी शुद्ध वाहत्या पाण्यात विसर्जित करावी किंवा घरातील पवित्र ठिकाणी ठेवावी.

जर राखी अचानक तुटली किंवा तिचे तुकडे झाले, तर ती पिंपळ किंवा वडाच्या झाडासारख्या पवित्र झाडाच्या मुळाजवळ जमिनीत पुरली पाहिजे. ज्योतिषांच्या मते, जन्माष्टमीनंतर वर्षभर राखी बांधून ठेवल्याने ती अपवित्र होते आणि हानी होण्याचा धोका असतो, म्हणून ती वेळेवर विधीपूर्वक काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)

Follow Us
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत