AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय

वरलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यात शुक्रवारी पाळले जाते. यावर्षी वरलक्ष्मी व्रत 28 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी तुम्ही काही सोपे ज्योतिषीय उपाय करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकता. तिच्या आशीर्वादाने तुम्ही संपत्ती, मालमत्ता आणि समृद्धी वाढू शकता.

वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा 'हे' 3 सोपे उपाय
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Aug 30, 2026 | 3:11 PM
Share

दरवर्षी वरलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यात शुक्रवारी पाळले जाते. यंदा वरलक्ष्मी व्रत 28 ऑगस्ट रोजी आहे. यादिवशी लक्ष्मी मातेची विधीपूर्वक पूजा केली जाते. तिच्या आशीर्वादाने दारिद्र्य, दुःख, वेदना आणि रोग दूर होतात आणि धन, सुख व समृद्धीत वाढ होते. त्यामुळे तुम्हालाही धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी 28 ऑगस्ट ही एक चांगली संधी आहे. जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला तर तुम्ही लॉटरीसुद्धा जिंकू शकता. याचा अर्थ तुमचे नशीब उजळू शकते. या दिवशी तुम्ही काही उपाययोजना केल्या पाहिजेत. चला तर मग या खास उपायाबद्दल जाणून घेऊयात.

वरलक्ष्मी व्रतात धनप्राप्तीचे उपाय

कमळ बियांचा उपाय: धार्मिक मान्यतेनुसार, वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मी मातेची विधीपूर्वक पूजा करावी. या वेळी देवी लक्ष्मीला कमळमणीची माळ अर्पण करावी. त्यानंतर श्री लक्ष्मी स्तोत्र आणि श्री सूक्ताचे पठण करावे.

पूजेनंतर कमळमणीची माळ रात्रभर लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ही माळ लाल वस्त्रात गुंडाळून धनस्थान किंवा तिजोरीत ठेवण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात सुख-समृद्धी व आर्थिक स्थैर्य येते, अशी मान्यता आहे.

11 कवड्यांचा उपाय: वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून उपवास करण्याचा आणि पूजा करण्याचा संकल्प करा. दिवसभर उपवास करा आणि फळे खा. प्रदोष काळात लक्ष्मी मातेची पूजा करताना 11 पिवळ्या कवड्या अर्पण करा. तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. पांढऱ्या कवड्या घ्या आणि त्यांना हळद लावा. मग त्या देवी लक्ष्मीला अर्पण करा. पूजा झाल्यावर त्या कवड्या लाल कापडात बांधा. त्यानंतर ते तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. याच्या शुभ प्रभावाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील.

श्रीयंत्र उपाय: वरलक्ष्मी व्रताचे महत्त्व दिवाळीतील लक्ष्मी पूजेसारखेच आहे. या प्रसंगी आपला देव्हारा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर प्रदोष काळात लक्ष्मी मातेची पूजा करा. त्यावेळी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करावी. श्रीयंत्र स्थापित झाल्यावर तुम्ही दररोज त्याची पूजा करावी आणि तिथे तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर कमळाच्या मण्यांची माळ वापरून “ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः” या मंत्राचा जप करा. तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख, धन, समृद्धी आणि भरभराट होईल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर