AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prasad Niyam : डाव्या हाताने प्रसाद का देऊ नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण…..

why prashad is not given by left hand: प्रसाद म्हणजे फक्त मिठाई किंवा फळे नसून ते देवाच्या कृपेचे प्रतीक आहे. जेव्हा आपण ते योग्य पद्धतीने स्वीकारतो तेव्हा त्याचा आपल्या जीवनावरही सकारात्मक परिणाम होतो.

Prasad Niyam : डाव्या हाताने प्रसाद का देऊ नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण.....
| Edited By: | Updated on: May 24, 2025 | 7:25 PM
Share

हिंदू धर्मात पूजा आणि त्यात पाळले जाणारे नियम खूप महत्वाचे आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे नेहमी उजव्या हाताने प्रसाद स्वीकारणे. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, परंतु धार्मिक श्रद्धेनुसार ते महत्त्वाचे मानले जाते. प्रसाद हा देवाचा आशीर्वाद आहे असे म्हटले जाते आणि तो स्वीकारण्याची पद्धत देखील विशेष असावी. म्हणून, नेहमी लक्षात ठेवा की प्रसाद फक्त उजव्या हाताने घ्यावा आणि पूजेशी संबंधित गोष्टींचा आदर करा. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. हिंदू धर्मानुसार, ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नांदण्याास मदत होते.

धार्मित नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या सर्व कामामध्ये प्रगती होण्यास मदत होते. त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध््ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. अनेकांना मंदिरात गेल्यामुळे सकारात्मक उर्जा मिळते. जेव्हा आपण मंदिरात पूजा करतो किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतो तेव्हा शेवटी प्रसाद दिला जातो. हा प्रसाद केवळ खाण्यायोग्य पदार्थ नाही तर तो देवाच्या कृपेचे एक रूप मानला जातो. म्हणूनच ते घेताना स्वच्छता आणि योग्य पद्धत खूप महत्वाची आहे.

हिंदू धर्मात उजव्या हाताला शुभ मानले जाते. पूजा करणे, देवाला अन्न अर्पण करणे, दिवा लावणे किंवा आरती करणे ही सर्व चांगली कामे उजव्या हाताने केली जातात. उजव्या हाताने काम केल्याने चांगले परिणाम मिळतात असे मानले जाते. जेव्हा आपण देवाने दिलेला प्रसाद घेतो तेव्हा ते कृत्य देखील पवित्र मानले जाते. म्हणून, प्रसाद देखील उजव्या हातानेच घ्यावा. धार्मिक कार्यासाठी डावा हात योग्य मानला जात नाही. याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण आपली अनेक दैनंदिन कामे, जसे की शौच किंवा शरीर स्वच्छ करणे, डाव्या हाताने करतो. या कारणास्तव ते अपवित्र मानले गेले आहे. कोणत्याही पवित्र कामात डाव्या हाताचा वापर करू नये असे शास्त्रांमध्येही लिहिले आहे. बऱ्याचदा लोक घाईत असताना किंवा लक्ष देत नसताना डाव्या हाताने प्रसाद घेतात. ही सवय हळूहळू विकसित होते, परंतु ती टाळली पाहिजे. प्रसाद घेण्यापूर्वी, आपले हात स्वच्छ ठेवा आणि शक्य असल्यास, प्रथम हात जोडून देवाचे आभार माना. त्यानंतर उजव्या हाताने प्रसाद घ्या. असे केल्याने मनाला शांती मिळते आणि पूजेचे चांगले फळ देखील मिळते. धार्मिक तज्ञांचा असा विश्वास आहे की उजवा हात सूर्य आणि शुभ उर्जेचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, डावा हात चंद्र आणि लपलेल्या उर्जेशी संबंधित आहे. म्हणून शुभ कामांसाठी उजव्या हाताचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. प्रसादलाही हेच लागू होते. जेव्हा तुम्ही उजव्या हाताने प्रसाद घेता तेव्हा तुम्ही परमेश्वराची ऊर्जा योग्य स्वरूपात स्वीकारता.

प्रसाद नेहमी उजव्या हातानेच घेतात, कारण उजवा हात सकारात्म ऊर्जा देणारा मानला जातो आणि देवाचा आशीर्वाद देणारा मानला जातो. तसेच, डावा हात शारीरिक शुचितेसाठी वापरला जातो, त्यामुळे प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी डाव्या हाताचा वापर टाळला जातो. हिंदू धर्मात पूजा, हवन, यज्ञासारखी धार्मिक कार्ये उजव्या हाताने करणे शुभ मानले जाते. प्रसाद हा देवाचा आशीर्वाद मानला जातो, म्हणून तो उजव्या हातात घेणे योग्य मानले जाते. उजवा हात सकारात्मक ऊर्जा देणारा मानला जातो, तर डावा हात नकारात्मक ऊर्जा देणारा मानला जातो. धार्मिक विधी आणि पूजेत सकारात्मक ऊर्जा आवश्यक असल्याने उजव्या हाताचा वापर केला जातो. डावा हात अनेकदा शारीरिक कामांसाठी वापरला जातो, त्यामुळे त्याची शुद्धता कमी मानली जाते. त्यामुळे प्रसाद घेताना डाव्या हाताचा वापर करणे योग्य नाही, असे मानले जाते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार