AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीच्या वेळी महिला डोक्यावर पदर घेऊन चेहरा का झाकतात? जाणून घ्या यामागचं कारण

महाकाल नगरी उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या आरती दरम्यान महिलांनी डोक्यावर पदर घेऊन चेहरा झाकायचा असतो तर ही एक विशेष प्रथा पाळली जाते. चला याबद्दन जाणून घेऊयात...

महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीच्या वेळी महिला डोक्यावर पदर घेऊन चेहरा का झाकतात? जाणून घ्या यामागचं कारण
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Oct 07, 2025 | 3:34 PM
Share

महाकाल ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तर या मंदिरात दररोज सकाळी होणारी भस्म आरती ही एक अद्भुत आणि अनोखी परंपरा आहे, जी पाहण्यासाठी देश-विदेशातील भाविक येतात. या आरतीचे वैशिष्ट्य म्हणजे भगवान महाकाल यांना चंदन, फुले किंवा दागिन्यांनी सजवले जात नाही तर अस्थिच्या राखेने सजवले जाते. या आरतीत पुरुष आणि महिला दोघेही सहभागी होऊ शकतात, परंतु तुम्ही अनेकदा पाहिले असेल की या भस्म आरतीच्या वेळी महिला डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकतात आणि महादेवाचे दर्शन घेतात. तर असे करण्यामागील नेमकं कारण काय आहे? हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

भस्म आरतीचे महत्त्व

भस्म आरती ही भगवान शिवाची सर्वात आवडती आरती मानली जाते. यामध्ये महाकाल म्हणजेच शंकराच्या पिंडीला स्मशानभूमीतील अस्थिच्या राखेने सजवले जाते. ही राख विश्वाच्या नश्वरतेचे प्रतीक आहे आणि ती दर्शवते की जीवनाचे अंतिम सत्य मृत्यू आहे, ज्यानंतर सर्वकाही राखेत बदलते. ही आरती पाहण्यासाठी जगभरातून भाविक उज्जैनला येतात.

महिलांनी डोक्यावर पदर घेण्याचे कारण

धार्मिक मान्यतेनुसार, भस्म आरतीच्या वेळी महिलांनी डोक्यावर पदर घेण्याच्या प्रथेमागील मुख्य कारण म्हणजे भगवान शिवाचे निराकार रूप.

निराकार रूपाचा आदर: असे मानले जाते की भस्म आरतीच्या वेळी भगवान शिव त्यांच्या निराकार स्वरूपात असतात, ज्याला त्यांचे अघड रूप देखील म्हणतात. महिलांना हे रूप प्रत्यक्ष पाहणे निषिद्ध मानले जाते. शिवाचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या या अद्भूत रूपाचा आदर करण्यासाठी ही प्रथा केली जाते.

सृष्टीच्या साराचे तत्वज्ञान: भस्म शृंगार हे भगवान शिवाच्या तपस्वी स्वरूपाचे प्रतीक आहे. हे शृंगार हे देखील दर्शवते की भगवान शिव विश्वाच्या निर्मिती आणि विनाशाच्या मुळाशी आहेत. भस्म आरतीच्या वेळी स्त्रिया डोळे बंद करून किंवा डोक्यावर पदर घेऊन देवाच्या या रूपाचे आदर करतात.

आध्यात्मिक शिस्त: ही प्रथा केवळ धार्मिक श्रद्धा नसून एक आध्यात्मिक शिस्त देखील आहे. ती भक्तांना शिकवते की देव केवळ शारीरिक डोळ्यांनी दिसत नाही तर भक्ती आणि भावनेने दिसतो. डोक्यावर पदर घेणे हे दर्शवते की महिला त्यांच्या अंतर्मनातून देवाला पाहत आहेत.

परंपरा आणि श्रद्धेचे मिश्रण

महाकालच्या भस्म आरती दरम्यान डोक्यावर पदर घेणे ही प्रथा केवळ एक नियम नाही तर श्रद्धेचे एक खोल प्रतीक आहे. ती आपल्याला शिकवते की काही धार्मिक विधींमध्ये, परंपरेचे पालन केल्याने देवाबद्दलचा आपला आदर दिसून येतो. ही प्रथा अजूनही लाखो भक्त कोणत्याही प्रश्नाशिवाय करतात, जी त्यांची अढळ श्रद्धा आणि समर्पण दर्शवते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.