AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वी शाॅनंतर महाराष्ट्राचा आणखी एक स्फोटक सलामीवीर तयार

237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय अ संघाने (India A) आठ विकेट्स राखून विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी केवळ 33 षटकातच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पृथ्वी शाॅनंतर महाराष्ट्राचा आणखी एक स्फोटक सलामीवीर तयार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 22, 2019 | 4:39 PM
Share

India A Tour of West Indies A : भारतीय अ संघाने वेस्ट इंडिज अ संघावर 8 विकेट्सने विजय मिळवत 4-1 ने मालिका (unofficial ODI) खिशात घातली. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय अ संघाने (India A) आठ विकेट्स राखून विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी केवळ 33 षटकातच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

केवळ एका धावेने ऋतुराज गायकवाडचं शतक हुकलं. 11 चौकार आणि 3 षटकारांसह 89 चेंडूत त्याने 99 धावा केल्या. तर दुसरीकडे शुबमन गिलने 40 चेंडूतच 69 धावा केल्या. श्रेयस अय्यरने नाबाद 61 धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या सर्व मालिकेत ऋतुराज गायकवाडने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. मूळचा पुण्याचा असलेला ऋतुराज सध्या कमालीचा फॉर्मात आहे.

महाराष्ट्रातील सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज सलामीवीरांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानंतर युवा खेळाडू पृथ्वी शॉनेही कसोटी मालिकेत पदार्पणातच शतक ठोकून सलामीवीर म्हणून त्याचं स्थान पक्क केलं. पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. आता महाराष्ट्रातील आणखी एक सलामीवीर फलंदाज तुफान फॉर्मात आहे.

ऋतुराजने श्रीलंका अ आणि वेस्ट इंडिज अ विरुद्ध जून 2019 पासून अर्धशतकाच्या आतील खेळी अपवादानेच केली आहे. जूनपासून आजपर्यंत खेळलेल्या आठ डावांमध्ये त्याच्या नावावर दोन शतकं, ज्यामध्ये 187 या सर्वोच्च धावसंख्येचाही समावेश आहे. तर चार अर्धशतकं ठोकली आहेत. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज अ विरुद्ध त्याचं शतक फक्त एका धावेने हुकलं. आठ डावांमध्ये त्याने 116 च्या स्ट्राईक रेटने आणि 112.83 च्या सरासरीने 677 धावा केल्या आहेत. त्याच्या सलग आठ खेळींमध्ये 187* (136), 125* (94), 84 (59), 74 (73), 3 (10), 85 (102), 20 (17) आणि 99 (89) धावांचा समावेश आहे.

Follow Us
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...