AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीर याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर थेट या खेळाडूंचे टोचले कान, नाव घेत म्हटले…

भारताने कालच्या सामन्यात धमाकेदार गेम खेळला. यानंतर संघातील खेळाडूंचे काैतुक करताना गाैतम गंभीर दिसला. मात्र, त्यावेळी काही खेळाडूंना टोमणा मारतानाही गाैतम गंभीर दिसला. आता भारत उपात्य फेरीत पोहोचला आहे.

गौतम गंभीर याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर थेट या खेळाडूंचे टोचले कान, नाव घेत म्हटले...
Gautam Gambhir
| Updated on: Mar 02, 2026 | 11:07 AM
Share

कालचा महामुकाबला भारतासाठी करो या मरोचा होता… शेवटी भारताने आपली ताकद दाखवत हा सामना जिंकला. सुपर 8 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने 5 विकेट्स राखून वेस्ट इंडिजचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पराभवाचा थेट वचपा काढला. टी 20 वर्ल्ड कपला भारताने धमाकेदार पद्धतीने सुरूवात केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेसोबत भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजसोबतचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला जिंकायचा होता. त्याशिवाय भारताला उपांत्य फेरीचे तिकिट मिळणार नव्हते. भारताने ही दोन्ही सामने आपल्या नावावर करून थेट उपांत्य फेरी गाठली आहे. वेस्ट इंडिजने भारताने 196  धावांचे टार्गेट दिले होते. भारतीय क्रिकेटर संजू सॅमसन याने फक्त 50 बॉलमध्ये 97 धावांची जोरदार खेळी खेळत भारताला विजय मिळून दिला. संजूवर काैतुकांचा वर्षाव होत आहे.

या सामन्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अनेक प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. काही खेळांडूबद्दल स्पष्ट बोलताना गौतम गंभीर दिसला. सामन्यातील छोट्या योगदानाचेही काैतुक केले जात आहे हे चांगले असल्याचे त्याने म्हटले. यावेळी टोमणा मारत गौतम गंभीरने म्हटले की, बऱ्याच काळापासून फक्त काही लोकांनाच श्रेय मिळत आहे. सुरूवातीला संजू सॅमसनला मैदानाच्या बाहेर ठेवण्यात आले होते.

यावेळी लोक संजू सॅमसनबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, यावर बोलताना गंभीर स्पष्टपणे म्हणाला की, हा निर्णय खूप विचारपूर्वक घेण्यात आला होता. मुळात म्हणजे आम्हाला माहिती होते की, संजूमध्ये नक्की किती ताकद आहे. त्याच्या नावावर टी 20 मध्ये तीन शतक आहेत. कधी कधी दबावामुळे खेळाडूला बाहेर ठेवावेही लागते.

यावेळी गौतम गंभीर याला शिवम दुबे आणि तिलक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना गाैतम गंभीर म्हणाला की, माझ्यासाठी शिवमचे ते दोन चौकार संजूच्या 97 धावांइतकेच नक्की महत्त्वाचे आहेत. मुळात म्हणजे मोठे योगदान चर्चेत असते आणि छोटे छोटे योगदान टीमला जिंकवण्याकरिता मदत करते. आता गौतम गंभीर याच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगत आहे.

Follow Us
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.
अमेरिका, इस्त्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम
अमेरिका, इस्त्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम.
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय...
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय....
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं
बा देवा महाराजा! रो रो सेवा सुरू होण्याआधी नितेश राणेंचं गाऱ्हाणं.
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?
नागपूर एसबीएल कंपनी स्फोटात मृतांचा आकडा वाढणार?.
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा
भाजपकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा.
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल
अजितदादांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवारांचा सवाल.
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द
अमेरिका-इराण युद्ध; पुण्यातून आखाती देशात जाणारी विमाने रद्द.
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला
भारत दबावाखाली झुकणार नाही; संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला.