Team India : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांच्याबद्दल बीसीसीआयच्या मनात मोठा संशय, हे दोघे…

Team India : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या हे टीम इंडियाचे स्टार खेळाडू आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सामने भारताला जिंकून दिले आहेत. पण आता बीसीसीआयच्या मनात या दोघांबद्दल संशयाचं धुकं आहे.

Team India : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांच्याबद्दल बीसीसीआयच्या मनात मोठा संशय, हे दोघे...
Hardik Pandya-Rohit Sharma
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 21, 2026 | 4:57 PM

आयपीएल 2026 चा सीजन आता संपत आला आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने पुढच्यावर्षी होणारा वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन अफगाणिस्तान सीरीजसाठी टीमची घोषणा केली. निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयला रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या फिटनेसबद्दल चिंता आहे. त्या दोघांची अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजसाठी टीममध्ये निवड केली आहे. 50 ओव्हरचं सर्वोच्च स्तराच क्रिकेट खेळण्यासाठी दोघे सक्षम आहेत का? या बद्दल बीसीसीआयच्या मनात शंका आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

वनडे क्रिकेटध्ये प्रत्येक गोलंदाजाला 10 षटकं गोलंदाजी करता येते. हार्दिक पूर्ण 10 ओव्हर टाकू शकेल का? या बद्दल निवड समिती, टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआय यांना खात्री नाहीय. तेच रोहित शर्माबद्दलही आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत रोहितचा फिटनेस राहिल का? ही भिती आहे. हॅम स्ट्रिंग इंजरीमुळे रोहित शर्मा तीन आठवडे आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. बीसीसीआयने रोहितचा फिटनेस रिपोर्ट मागितला आहे. त्या तीन आठवड्यात रोहित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये आला नाही. रोहितला 50 ओव्हर फिल्डिंग करायची आहे. त्यासाठी रोहितचं शरीर तयार आहे का? आयपीएल सारखा वनडे क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा पर्याय नसतो. जेव्हा तुम्ही वयाच्या चाळीशीत येता, तेव्हा शरीराला बर व्हायला वेळ लागतो असं बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं.

सगळे सामने खेळलेला नाही

हार्दिक पंड्या सुद्धा या सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सगळे सामने खेळलेला नाही. चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यानंतर त्याने पाठिच्या दुखण्याची तक्रार केली होती. त्याने वानखेडे स्टेडियम आणि रिलायन्स फॅसिलिटीमध्ये ट्रेनिंग केली. तो आता पुन्हा जॉइंन झालाय. कालच कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात खेळला. तो 10 ओव्हर टाकू शकतो का? ही सिलेक्टर्सना मुख्य चिंता आहे. 2023 चा वनडे वर्ल्ड कप भारतात झाला होता. त्यावेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या दोन टी20 वर्ल्ड कपमध्ये 2024 आणि 2026 चं विजेतेपद भारताने पटकावलं. भारताने 2011 साली शेवटचा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.

Follow Us