AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, दिल्लीत… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जर देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात गेले, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येईल, असा दावा बड्या नेत्याने केला आहे. . संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असेही या नेत्याने स्पष्ट केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, दिल्लीत... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
| Updated on: Jul 11, 2026 | 10:50 AM
Share

संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरत सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतात आणि काही नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील देखील काही नावांची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, असा मोठा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

तर 100 टक्के बावनकुळे यांचा होणार विचार

तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात. सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असं राऊत स्पष्टपणे म्हणाले. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100 टक्के बावनकुळे यांचा विचार आणि शिफार, स्वत: देवेंद्र फडणवीसचं करतील, हे माझं आकलन आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.

जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल..

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहील. जो राज्य योग्य दिशेने पुढ घेऊन जाईल आणि जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणीही व्यक्ती असेल, तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले.

मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाहीयोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे, असं राऊतांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेक शक्यता व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून दिल्लीत काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला