AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 वेळा ज्यांनी हरवलं, CWG क्रिकेटच्या सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा त्याच संघाविरुद्ध सामना

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये क्रिकेटचे सेमीफायनल सामने कुठल्या चार संघांमध्ये होणार? ते निश्चित झालं आहे. भारत, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार टीम्स मध्ये सेमीफायनल रंगणार आहे.

17 वेळा ज्यांनी हरवलं, CWG क्रिकेटच्या सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा त्याच संघाविरुद्ध सामना
womens teamImage Credit source: twitter
| Updated on: Aug 05, 2022 | 4:29 PM
Share

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये क्रिकेटचे सेमीफायनल सामने कुठल्या चार संघांमध्ये होणार? ते निश्चित झालं आहे. भारत, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार टीम्स मध्ये सेमीफायनल रंगणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा ज्या संघाविरुद्ध सामना आहे, त्यांनी टी 20 मध्ये एकदा, दोनदा नाही तर चक्क 17 वेळा भारतीय महिला संघाचा पराभव केलाय. भारतीय संघाला त्या टीम विरुद्ध फारसे सामने जिंकण जमलेलंच नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कॉमनवेल्थच्या फायनल मध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नसेल. त्यांना फायनल मध्ये पोहोचण्यासाठी सर्वोत्तम क्रिकेट खेळावं लागेल. आधी काय झालं, ते विसरुन मैदानात उतरावं लागेल.

कोण कोणाविरुद्ध खेळणार

CWG मध्ये भारत सेमीफायनल मध्ये इंग्लंडला भिडणार आहे. दुसरी सेमीफायनल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होईल. दोन्ही सामने 6 ऑगस्टला होणार आहेत.

इंग्लंड विरुद्ध 17 T20I सामने हरलेत

सेमीफायनल ते फायनल पर्यंतचा प्रवास भारतीय महिला क्रिकेट संघासाठी किती कठीण असेल, ते आकड्यांवरुन समजून घ्या. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघात टी 20 मध्ये आतापर्यंत 22 सामने झालेत. त्यात 22 पैकी 17 वेळा इंग्लंडची टीम जिंकली आहे. फक्त 5 वेळाच भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.

इंग्लंडचा संघ आपल्या घरात खेळतोय, ही सुद्धा त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. होम कंडीशन्सचा त्यांना फायदा मिळेल. इंग्लंडने मायदेशात भारताविरुद्ध 8 टी 20 सामने खेळलेत. त्यातही त्यांचा दबदबा कायम आहे. इंग्लंडने 6 तर भारताने 2 सामने जिंकलेत. cwg 2022, cwg 2022 cricket semi final, india vs england, australia vs new zealand,

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.