AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli: ‘जिंकण किंवा हरणं तुमच्या हातात नाहीय पण…’ विराट कोहलीने सोडलं मौन

लीडर बनण्यासाठी तुम्हाला कॅप्टन बनण्याची आवश्यकता नाही. एमएस धोनी संघात होता, तेव्हा असं नव्हत की, तो लीडर नव्हता.

Virat Kohli: 'जिंकण किंवा हरणं तुमच्या हातात नाहीय पण...' विराट कोहलीने सोडलं मौन
ALL PHOTOS AFP
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 7:19 PM
Share

मुंबई: “पुढे जाण्यासाठी कुठली वेळ योग्य आहे, हे समजणं सुद्धा नेतृत्वाचाच एक भाग आहे. मी नेहमीच कर्णधारासारखा विचार केलाय” असं विराट कोहली (Virat Kohli) एका कार्यक्रमात म्हणाला. कसोटी संघाचं (Test Team) कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने प्रथमच लीडरशीपच्या विषयावर भाष्य केलं आहे. सात वर्षानंतर विराटने भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं. 2014 मध्ये एमएस धोनीकडून विराटकडे कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी आली होती. विराटच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 68 पैकी 40 कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला. भारताचा आतापर्यंतचा तो सर्वात यशस्वी कॅप्टन (successful captain) आहे. “एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. पहिलं म्हणजे काय मिळवायचय ते तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे. तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचाल किंवा नाही पोहचणार. प्रत्येक गोष्टीला एक कार्यकाळ असतो. मुदत असते. त्याची तुम्हाला कल्पना असली पाहिजे. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघाला जास्त योगदान देऊ शकता” असं कोहली एका कार्यक्रमात म्हणाला.

लीडर बनण्यासाठी तुम्हाला… “लीडर बनण्यासाठी तुम्हाला कॅप्टन बनण्याची आवश्यकता नाही. एमएस धोनी संघात होता, तेव्हा असं नव्हत की, तो लीडर नव्हता. कर्णधारपद सोडल्यानंतरही आम्हाला धोनीचा सल्ला लागायचा” “जिंकण किंवा हरणं तुमच्या हातात नाहीय पण प्रत्येक दिवस सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही करु शकता” असे विराट म्हणाला.

हा सुद्धा नेतृत्वाचाच एक भाग “पुढे जाणं, त्यासाठी योग्य वेळ निवडणं हा सुद्धा नेतृत्वाचाच एक भाग आहे. तुम्ही वेगळ्या रोलमध्ये राहून संघाला तितकचं योगदान देऊ शकता” असं विराटने सांगितलं. “मी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो, नंतर कर्णधार झालो. मी संघात एक खेळाडू होतो तेव्हा सुद्धा कर्णधारासारखाचा विचार करायचो. संघ जिंकला पाहिजे, एवढीच माझी भावना होती” असे विराट म्हणालाा.

विराटने टी-20 वर्ल्डकपनंतर टी-20 संघाची कॅप्टनशिप सोडली. त्याने आधीच तशी घोषणा केली होती. पण विराटला वनडेच्या कर्णधारपदावर कायम रहायचे होते. पण बीसीसीआयला मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते. त्यामुळे त्याला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं.

After resign from team india test captaincy virat kohli First time break his silence

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?