AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय ते इथेच…! हार्दिक पंड्याला ज्या मैदानात डिवचलं, तिथेच त्याच्या नावाचा होतोय जयघोष Watch Video

आयपीएल स्पर्धेत हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोपवल्यानंतर क्रीडाप्रेमींच्या रडारवर आला होता. रोहित शर्माला दूर करत त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. दरम्यान हार्दिक पंड्याला डिवचण्याची एकही संधी चाहत्यांनी सोडली नाही. आता त्याच्याच नावाचा जयघोष होत आहे.

काय ते इथेच...! हार्दिक पंड्याला ज्या मैदानात डिवचलं, तिथेच त्याच्या नावाचा होतोय जयघोष Watch Video
| Updated on: Jul 04, 2024 | 6:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा सिंहाचा वाटा आहे. दक्षिण अफ्रिकेला पाच षटकात 30 धावांची गरज होती. यात हार्दिक पांड्याने दोन षटकं टाकली. तसेच दोन महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. यामुळे टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुकर झाला. 17वं षटक टाकताना हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर क्लासेनची विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन संघ बॅकफूटवर गेला. तसेच फक्त चार धावा दिल्या. त्यानंतर शेवटचं षटक पुन्हा एकदा हार्दिक पंड्याच्या हाती सोपवण्यात आलं. यावेळी पहिल्याच चेंडूवर घातक अशा मिलरला बाद केलं आणि सामना आपल्या पारड्यात झुकवला. ही दोन षटकं भारताच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी हार्दिक पंड्याला डिवचणारे आता त्याचं कौतुक करताना दिसत आहे. वानखेडे आणि मरिन ड्राईव्हवर जमलेला जनसमुदाय हार्दिका पंड्याचा जयघोष करत आहे. त्यामुळे चाहत्यांचं वेगळ रुप पाहायला मिळालं आहे. आयपीएलमध्ये जितका अपमान झाला त्याच्या दुप्पट कौतुकास पात्र ठरला आहे.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर हार्दिक पंड्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सचे आणि खासकरून रोहित शर्माचे फॅन्स नाराज झाले होते. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे हार्दिक पंड्याला डिवचलं जात होतं. त्याचा फॉर्म पाहता त्याला टी20 वर्ल्डकप संघातही घेऊ नये असा सूर होता. मात्र या सर्वांवर हार्दिक पंड्या भारी पडला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली. तसेच टीकाकारांची तोंड कामगिरीने बंद केली. ज्या वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी डिवचल होतं त्याच मैदानावर आता त्याच्या नावाचा जयघोष होत आहे.

भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर 17 वर्षांनी आणि आयसीसी चषकावर 11 वर्षांनी नाव कोरलं आहे. 2007 साली भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर आता 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफ्रिकन संघाला फक्त 169 धावा करता आल्या. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकत जेतेपदावर नाव कोरलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.