AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय ते इथेच…! हार्दिक पंड्याला ज्या मैदानात डिवचलं, तिथेच त्याच्या नावाचा होतोय जयघोष Watch Video

आयपीएल स्पर्धेत हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोपवल्यानंतर क्रीडाप्रेमींच्या रडारवर आला होता. रोहित शर्माला दूर करत त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. दरम्यान हार्दिक पंड्याला डिवचण्याची एकही संधी चाहत्यांनी सोडली नाही. आता त्याच्याच नावाचा जयघोष होत आहे.

काय ते इथेच...! हार्दिक पंड्याला ज्या मैदानात डिवचलं, तिथेच त्याच्या नावाचा होतोय जयघोष Watch Video
| Updated on: Jul 04, 2024 | 6:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा सिंहाचा वाटा आहे. दक्षिण अफ्रिकेला पाच षटकात 30 धावांची गरज होती. यात हार्दिक पांड्याने दोन षटकं टाकली. तसेच दोन महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. यामुळे टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुकर झाला. 17वं षटक टाकताना हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर क्लासेनची विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन संघ बॅकफूटवर गेला. तसेच फक्त चार धावा दिल्या. त्यानंतर शेवटचं षटक पुन्हा एकदा हार्दिक पंड्याच्या हाती सोपवण्यात आलं. यावेळी पहिल्याच चेंडूवर घातक अशा मिलरला बाद केलं आणि सामना आपल्या पारड्यात झुकवला. ही दोन षटकं भारताच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी हार्दिक पंड्याला डिवचणारे आता त्याचं कौतुक करताना दिसत आहे. वानखेडे आणि मरिन ड्राईव्हवर जमलेला जनसमुदाय हार्दिका पंड्याचा जयघोष करत आहे. त्यामुळे चाहत्यांचं वेगळ रुप पाहायला मिळालं आहे. आयपीएलमध्ये जितका अपमान झाला त्याच्या दुप्पट कौतुकास पात्र ठरला आहे.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर हार्दिक पंड्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबई इंडियन्सचे आणि खासकरून रोहित शर्माचे फॅन्स नाराज झाले होते. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे हार्दिक पंड्याला डिवचलं जात होतं. त्याचा फॉर्म पाहता त्याला टी20 वर्ल्डकप संघातही घेऊ नये असा सूर होता. मात्र या सर्वांवर हार्दिक पंड्या भारी पडला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली. तसेच टीकाकारांची तोंड कामगिरीने बंद केली. ज्या वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी डिवचल होतं त्याच मैदानावर आता त्याच्या नावाचा जयघोष होत आहे.

भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर 17 वर्षांनी आणि आयसीसी चषकावर 11 वर्षांनी नाव कोरलं आहे. 2007 साली भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर आता 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफ्रिकन संघाला फक्त 169 धावा करता आल्या. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकत जेतेपदावर नाव कोरलं.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.