AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या पत्नीनं पहिल्यांदाच केली अशी पोस्ट, मनातलं सर्वकाही सांगून टाकलं

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना गमवल्याची सळ अजून काही केल्या कमी होत नाही. स्पर्धेत सलग विजय मिळवत अंतिम फेरी गाठली खरी पण शेवट मात्र कडू झाला. ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. यामुळे रोहित शर्मासह इतर खेळाडूंना अश्रू अनावर झाले. आता कुठे गाडी रुळावर यायला लागली आहे. आता रोहित शर्माच्या पत्नीने एक पोस्ट करत मन की बात सांगितली आहे.

वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या पत्नीनं पहिल्यांदाच केली अशी पोस्ट, मनातलं सर्वकाही सांगून टाकलं
वर्ल्डकपमधील पराभवाची सळ काही केल्या कमी होईना! दहा दिवसानंतर रोहितच्या पत्नीने सांगितली 'मन की बात'
| Updated on: Nov 30, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. अंतिम फेरीत भारतीय संघ बाजी मारेल अशीच आशा होती. पण तसं झालं नाही. शेवटच्या सामन्यात नियतीच्या मनात भलतंच काही होतं. पॅट कमिन्सने लाखो भारतीयांना गप्प करण्याची शपथ खरी करून दाखवली. विराट कोहली बाद झाल्यानंतर तसंच घडत गेलं आणि ऑस्ट्रेलियाने विजयी चौकार मारेपर्यंत तसंच अनुभूती आली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यालाही अश्रू अनावर झाले. हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे धाव घेत अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या पराभवाला आज दहा दिवस पूर्ण झाले आहे. दहा दिवसानंतर रोहित शर्माची पत्नी रीतिका हिने एक पोस्ट केली आहे आणि फोटोखाली एक कॅप्शन लिहिली आहे.

सोशल मीडियावर हा फोटो आता वेगाने वायरल होत आहे. रोहित शर्मा बऱ्याच गोष्टी विसरतो असं संघातील खेळाडूंनी अनेकदा समोर आणलं आहे. पण हा पराभव विसरणं रोहित सर्माला कठीण आहे. कर्णधार रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. फोटोत रोहित शर्माच्या चेहऱ्यावर हसू असल्याचं दिसत आहे. तसेच पत्नीने फोटोखाली ‘माय बॉय’ अशी कॅप्शन लिहिली आहे.

रोहित शर्मा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार की नाही? हे अजून ठरलेलं नाही. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआय रोहित शर्माची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. बीसीसीआय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा करणार आहेत. मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीतील पराभवानंतर रोहित शर्माने कर्णधारपद सोडल्याची चर्चा आहे. पण 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. 3 सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2023-25 च्या दृष्टीने कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता संघात कोणते खेळाडू खेळणार? याबाबत क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे.

Follow Us
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता