AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, तरीही कर्णधार हरमनप्रीत कौरला एक खंत

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 जिंकली. भारताने दुसरा सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. मात्र शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने अपेक्षित कामगिरी करून मालिका जिंकली. मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार हरमनप्रीत कौर हीने एक खंत बोलून दाखवली आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, तरीही कर्णधार हरमनप्रीत कौरला एक खंत
| Updated on: Oct 29, 2024 | 10:33 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-1 खिशात घातली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 232 धावा केल्या आणि विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 44.2 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. स्मृती मंधानाचं शतक आणि हरमनप्रीत कौरचं नाबाद 59 धावांच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. या सामन्यातील कामगिरीसाठी स्मृती मंधानाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. न्यूझीलंडकडून ब्रूके हालिडेने जबरदस्त फलंदाजी केली. एकीकडे झटपट विकेट जात असताना एकाकी झुंज देली. 96 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर प्रिया मिश्राला दोन विकेट घेण्यात यश मिळालं. रेणुका सिंग आणि साइमा ठाकोर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान या विजयानंतर हरमनप्रीत कौरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

“मी सकाळी म्हटल्याप्रमाणे, आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आणि आज आम्ही ते करू शकलो याचा आनंद आहे. आम्ही जेव्हाही खेळतो तेव्हा आम्हाला नेहमी आमचे 100 टक्के द्यायचे असते परंतु काहीवेळा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. एक प्रोफोशनल क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला पुढे जात राहावे लागेल. आम्ही संघाच्या बैठकीत या गोष्टींवर चर्चा केली त्यामुळे शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर आम्ही कमबॅक करू शकलो. या विजयाचं श्रेय स्मृतीला द्यायला आवडेल. ती सुरुवातीपासूनच संघर्ष करत होती पण ती धावा करण्यात यशस्वी झाली. ही मालिका कोणत्याही किंमतीत जिंकायची होती. आमच्या भागीदारीबद्दल खरोखर आनंदी आहे.”, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

“आम्ही नेहमी आमच्या क्षेत्ररक्षणाबद्दल बोलत असतो, हे एक क्षेत्र आहे ज्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आम्ही कठोर परिश्रम करत आहोत परंतु जोपर्यंत आम्ही सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करू शकत नाही तोपर्यंत निकालाची वाट पाहत आहोत.”, अशी मत कर्णधार हरमनप्रीत कौर हीने व्यक्त केलं.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?