AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, तरीही कर्णधार हरमनप्रीत कौरला एक खंत

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 जिंकली. भारताने दुसरा सामना गमावल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. मात्र शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने अपेक्षित कामगिरी करून मालिका जिंकली. मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार हरमनप्रीत कौर हीने एक खंत बोलून दाखवली आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, तरीही कर्णधार हरमनप्रीत कौरला एक खंत
| Updated on: Oct 29, 2024 | 10:33 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-1 खिशात घातली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 232 धावा केल्या आणि विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 44.2 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. स्मृती मंधानाचं शतक आणि हरमनप्रीत कौरचं नाबाद 59 धावांच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. या सामन्यातील कामगिरीसाठी स्मृती मंधानाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. न्यूझीलंडकडून ब्रूके हालिडेने जबरदस्त फलंदाजी केली. एकीकडे झटपट विकेट जात असताना एकाकी झुंज देली. 96 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर प्रिया मिश्राला दोन विकेट घेण्यात यश मिळालं. रेणुका सिंग आणि साइमा ठाकोर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान या विजयानंतर हरमनप्रीत कौरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

“मी सकाळी म्हटल्याप्रमाणे, आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आणि आज आम्ही ते करू शकलो याचा आनंद आहे. आम्ही जेव्हाही खेळतो तेव्हा आम्हाला नेहमी आमचे 100 टक्के द्यायचे असते परंतु काहीवेळा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. एक प्रोफोशनल क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला पुढे जात राहावे लागेल. आम्ही संघाच्या बैठकीत या गोष्टींवर चर्चा केली त्यामुळे शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर आम्ही कमबॅक करू शकलो. या विजयाचं श्रेय स्मृतीला द्यायला आवडेल. ती सुरुवातीपासूनच संघर्ष करत होती पण ती धावा करण्यात यशस्वी झाली. ही मालिका कोणत्याही किंमतीत जिंकायची होती. आमच्या भागीदारीबद्दल खरोखर आनंदी आहे.”, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

“आम्ही नेहमी आमच्या क्षेत्ररक्षणाबद्दल बोलत असतो, हे एक क्षेत्र आहे ज्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आम्ही कठोर परिश्रम करत आहोत परंतु जोपर्यंत आम्ही सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करू शकत नाही तोपर्यंत निकालाची वाट पाहत आहोत.”, अशी मत कर्णधार हरमनप्रीत कौर हीने व्यक्त केलं.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.