AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh : GT vs KKR | रिंकू याने फक्त सामनाच नाही जिंकवला तर माहीचा तो रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

थरारक सामन्यात युवा खेळाडू रिंकू सिंग याने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. एकाच ओव्हरमध्ये त्याने सलग पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूने या विजयासह एक मोठा रेकॉर्ड नावावर केलेला आहे.

Rinku Singh : GT vs KKR | रिंकू याने फक्त सामनाच नाही जिंकवला तर माहीचा तो रेकॉर्ड मोडत रचला इतिहास
| Updated on: Apr 09, 2023 | 9:35 PM
Share

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या थरारक सामन्यात युवा खेळाडू रिंकू सिंग याने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. एकाच ओव्हरमध्ये त्याने सलग पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूने या विजयासह एक मोठा रेकॉर्ड नावावर केलेला आहे.

केकेआर संघाला 29 धावांची गरज होती त्यावेळी उमेश यादव हा स्ट्राइक वर होता तर गुजरात टायटन्सकडून यश दयाळ बॉलिंग करत होता. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने 1 धाव घेत स्ट्राइक दिली. त्यानंतर रिंकूने पाच सिक्स मारत गुजरात संघाचा हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला.

शेवटच्या ओव्हरमध्ये चेस करताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम हा रिंकू सिंगने केलाय. याआधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर होता. धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये आरसीबीविरूद्ध 24 धावा केल्या होत्या. आता रिंकू सिंगने आजच्या गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हर मध्ये 30 धावा काढत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

रिंकूने 20 व्याओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर टिकून राहत संघाला विजय मिळवला. त्यासोबतच त्याने भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचाही रेकॉर्ड मोडला आहे. 2009 मध्ये रोहित शर्माने केकेआर विरुद्ध शेवटच्या शतकात 22 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. तर दोन्हीने 2016 साली पंजाब विरुद्ध बावीस धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना केकेआरला 205 धावांचं लक्ष दिलं होतं या लक्षाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात म्हणावी अशी काही झाली नाही कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये गुरबाजला मोहम्मद शमीने बाद केलं. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या व्यंकटेश अय्यर याने सामन्याच रूप पालटून टाकलं होतं. मात्र अय्यर 83 धावांवर बाद झाला आणि राशिद खान याने हॅट्रिक घेत सामन्यात ट्विस्ट आणला. परंतु मैदानात रिंकू सिंगने शेवटच्या पाच चेंडूंमध्ये 28 धावांची गरज असताना सलग पाच षटकार मारत सामना केकेआरला विजय मिळवून दिला.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | रशीद खान (कॅप्टन), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.