AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट-नवीन उल हक आणि गौतम गंभीरमधील वादाबाबात अमित मिश्राचा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं ते सांगितलं?

आयपीएल 2023 स्पर्धेत गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद कोणीच विसरू शकत नाही. दिग्गज खेळाडू आमनेसामने आल्याने बरंच काही घडलं होतं. मात्र 2024 स्पर्धेत हा वाद शमला. पण नेमकं तेव्हा काय झालं याबाबत कोणालाच स्पष्ट माहिती नाही. या घटनेचा साक्षीदार असलेल्या अमित मिश्राने अखेर तेव्हा नेमकं काय झालं ते सांगितलं.

विराट-नवीन उल हक आणि गौतम गंभीरमधील वादाबाबात अमित मिश्राचा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं ते सांगितलं?
| Updated on: Jul 16, 2024 | 7:12 PM
Share

गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाला आहे. तसेच दिग्गज खेळाडू विराट कोहली त्याच्या प्रशिक्षणात मैदानात उतरणार आहे. अशात या दोघांचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसं पाहिलं तर 2024 स्पर्धेत या दोघांमधील वाद संपुष्टात आला असून त्यावर पडदा पडला आहे. पण आता अमित मिश्राने नेमकं हा वाद कसा सुरु झाला आणि काय झालं ते सांगितलं आहे. “बंगळुरुमध्ये आम्ही सामना खेळत होतो. शेवटच्या षटकात आम्ही सामना जिंकलो. तेव्हा गंभीरने थोडी आक्रमकता दाखवली. हलकी फुलकी. कारण प्रेक्षक खूपच विचित्र पद्धतीने गोंधळ घालत होते. शेवटी आम्ही सामना जिंकलो. तेव्हा गंभीरने सांगितलं की इतका आवाज करू नका. गप्प बसा आम्ही सामना जिंकू. त्या सामन्यातही विराटकडून काहीतर झालं होतं. पण ते प्रकरण तिथेच संपलं.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“लखनौच्या सामन्यात विराट कोहली हे प्रकरण वाढवेल असं वाटलं नव्हतं. पण आम्हाला याबाबत काहीच आक्षेप नव्हता. पण त्याने नंतर आमच्या खेळाडूंना अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. कायल मेयर्ससोबत त्याचा काय वाद होता. त्यालाही बाद झाल्यानंतर उलटसूलट बोलला. नवीन उल हक बॉल टाकत असातना त्याला उलटसूलट बोलला. आणखी काही खेळाडूंना असंच बोललं गेलं. प्रेक्षकांना हात दाखवत होता. ये करत ते करत होता. खूप साऱ्या गोष्टी थांबवू शकत होता. पण विराट कोहलीने तसं केलं नाही.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“मी नवीनसोबत फलंदाजी करत होतो. तेव्हा मी त्याला जाऊन सांगितलं की कोणासोबत बोलत आहेस. तो यंगस्टर आहे. गप्प बस. या सर्व गोष्टी इथेच थांबव. तेव्हा विराट कोहलीने सांगितलं मला काय समजवतो त्या जाऊन समजव. पण तो मला काहीच बोललं नाही. माझ्यासोबत व्यवस्थित बोलला. मी त्याला सांगितलं की तो गप्प उभा आहे आणि तू इथून त्याला बोलत आहेस. तेव्हा कोहली म्हणाला मला नको शिकवू, त्याला जाऊन सांग कसं वागतो ते. ठीक आहे तो तसा वागत असेल. पण तू तर मोठा प्लेयर आहेस. तो तुझ्या जवळपासही नाही. मग वाद का करत आहे, असं मी त्याला सांगितलं.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“सामना संपल्यानंतर विराटने पुन्हा एकदा नवीनला अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. हात मिळवताना सुरुवात झाली. जेव्हा गंभीर आला आणि त्याला याचा राग आला. सामना संपला आहे. तुम्ही जिंकला आहात. मग पुन्हा का सुरुवात केली. का बोलत आहे, असं का वागत आहेस. मग मी गौतमसोबत उभा राहिलो. तेव्हा मलाही राग आला होता.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

Follow Us
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...