AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट-नवीन उल हक आणि गौतम गंभीरमधील वादाबाबात अमित मिश्राचा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं ते सांगितलं?

आयपीएल 2023 स्पर्धेत गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद कोणीच विसरू शकत नाही. दिग्गज खेळाडू आमनेसामने आल्याने बरंच काही घडलं होतं. मात्र 2024 स्पर्धेत हा वाद शमला. पण नेमकं तेव्हा काय झालं याबाबत कोणालाच स्पष्ट माहिती नाही. या घटनेचा साक्षीदार असलेल्या अमित मिश्राने अखेर तेव्हा नेमकं काय झालं ते सांगितलं.

विराट-नवीन उल हक आणि गौतम गंभीरमधील वादाबाबात अमित मिश्राचा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं ते सांगितलं?
| Updated on: Jul 16, 2024 | 7:12 PM
Share

गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाला आहे. तसेच दिग्गज खेळाडू विराट कोहली त्याच्या प्रशिक्षणात मैदानात उतरणार आहे. अशात या दोघांचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसं पाहिलं तर 2024 स्पर्धेत या दोघांमधील वाद संपुष्टात आला असून त्यावर पडदा पडला आहे. पण आता अमित मिश्राने नेमकं हा वाद कसा सुरु झाला आणि काय झालं ते सांगितलं आहे. “बंगळुरुमध्ये आम्ही सामना खेळत होतो. शेवटच्या षटकात आम्ही सामना जिंकलो. तेव्हा गंभीरने थोडी आक्रमकता दाखवली. हलकी फुलकी. कारण प्रेक्षक खूपच विचित्र पद्धतीने गोंधळ घालत होते. शेवटी आम्ही सामना जिंकलो. तेव्हा गंभीरने सांगितलं की इतका आवाज करू नका. गप्प बसा आम्ही सामना जिंकू. त्या सामन्यातही विराटकडून काहीतर झालं होतं. पण ते प्रकरण तिथेच संपलं.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“लखनौच्या सामन्यात विराट कोहली हे प्रकरण वाढवेल असं वाटलं नव्हतं. पण आम्हाला याबाबत काहीच आक्षेप नव्हता. पण त्याने नंतर आमच्या खेळाडूंना अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. कायल मेयर्ससोबत त्याचा काय वाद होता. त्यालाही बाद झाल्यानंतर उलटसूलट बोलला. नवीन उल हक बॉल टाकत असातना त्याला उलटसूलट बोलला. आणखी काही खेळाडूंना असंच बोललं गेलं. प्रेक्षकांना हात दाखवत होता. ये करत ते करत होता. खूप साऱ्या गोष्टी थांबवू शकत होता. पण विराट कोहलीने तसं केलं नाही.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“मी नवीनसोबत फलंदाजी करत होतो. तेव्हा मी त्याला जाऊन सांगितलं की कोणासोबत बोलत आहेस. तो यंगस्टर आहे. गप्प बस. या सर्व गोष्टी इथेच थांबव. तेव्हा विराट कोहलीने सांगितलं मला काय समजवतो त्या जाऊन समजव. पण तो मला काहीच बोललं नाही. माझ्यासोबत व्यवस्थित बोलला. मी त्याला सांगितलं की तो गप्प उभा आहे आणि तू इथून त्याला बोलत आहेस. तेव्हा कोहली म्हणाला मला नको शिकवू, त्याला जाऊन सांग कसं वागतो ते. ठीक आहे तो तसा वागत असेल. पण तू तर मोठा प्लेयर आहेस. तो तुझ्या जवळपासही नाही. मग वाद का करत आहे, असं मी त्याला सांगितलं.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

“सामना संपल्यानंतर विराटने पुन्हा एकदा नवीनला अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. हात मिळवताना सुरुवात झाली. जेव्हा गंभीर आला आणि त्याला याचा राग आला. सामना संपला आहे. तुम्ही जिंकला आहात. मग पुन्हा का सुरुवात केली. का बोलत आहे, असं का वागत आहेस. मग मी गौतमसोबत उभा राहिलो. तेव्हा मलाही राग आला होता.”, असं अमित मिश्राने सांगितलं.

Follow Us
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!