AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : तिकीटाची किंमत बेसुमार! सुविधांच्या नावाने बोंब, बाराबती स्टेडियमची दुरावस्था

Barabati Stadium Cuttack : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना हा कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये किमान सुविधांचा अभाव असल्याचं चाहत्यांकडून म्हटलं जातं. तिकीटासाठी हजारो रुपये खर्चूनही किमान सुविधा मिळत नसल्याने चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

IND vs SA : तिकीटाची किंमत बेसुमार! सुविधांच्या नावाने बोंब, बाराबती स्टेडियमची दुरावस्था
Team India Barabati Stadium CuttackImage Credit source: PTI
| Updated on: Dec 08, 2025 | 10:03 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना हा कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना मंगळवारी 9 डिसेंबरला होणार आहे. ओडीसातील बाराबती स्टेडियम भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार राहिला आहे. बाराबती ऐतिहासिक असं स्टेडियममध्ये आहे. याच स्टेडियममध्ये माजी ऑलराउंड कपिल देव यांनी 300 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या होत्या. मात्र आता बाराबती स्टेडियमची दुरावस्था झाली आहे. बाराबती स्टेडियममध्ये किमान सुविधांची बोंब आहे. त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्याआधीच या स्टेडियममध्ये नसलेल्या सुविधांची चर्चा रंगली आहे.

स्टेडियममध्ये सुविधांचा अभाव

बाराबती स्टेडियममध्ये बैठक व्यवस्था ही चिंताजनक बाब आहे. या स्टेडियममध्ये आधुनिक आसन व्यवस्था नाही. त्यामुळे चाहत्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तसेच प्रेस बॉक्सची स्थिती काही वेगळी नाही. माध्यमांचे प्रतिनिधी याच प्रेस बॉक्समधून सामन्याचं वृत्तांकन करतात. मोठे खांब आणि साईडस्क्रीनमुळे प्रेस बॉक्समधून मैदानातील दृष्य पाहण्यास अडचणींचा सामना करावा लागतो.

याच मैदानात फेब्रुवारी 2025 मध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यादरम्यान फ्लडलाईट्स खराब झाल्याने खेळ थांबवावा लागला होता. तेव्हा 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाया गेला होता. तसेच या मैदानात मोजकेच संकटसमयी मार्ग (Emergency Exit) असल्याने क्रिकेट चाहत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे नको तसं घडलं तर काय? अशी भीती चाहत्यांना आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता या मैदानात संकटसमयी मार्गात वाढ करावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांची आहे.

पाण्याची बोंब

क्रिकेट चाहत्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसेच शौचलयांमध्येही स्वच्छता नसते. स्टेडियममध्ये कधी कधी क्षमतेपेक्षा अधिक क्रिकेट चाहते येतात. त्यामुळे तो वेगळा त्रास सहन करावा लागतो. तिकीटांची चढ्या दरात विक्री हा कायमचाच मुद्दा राहिलाय.

बीसीसीआयच्या निधीचा वापर न केल्याचा आरोप

दरम्यान ओसीए अर्थात ओडिशा क्रिकेट असोसिएशनवर बीसीसीआयकडून मिळालेल्या निधीचा वापर न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुविधांचा अभाव असल्याने या स्टेडियमला सामन्यांच्या आयोजनाचा मान मिळत नसल्याचा सूर पाहायला मिळत आहे.

बाराबती स्टेडियमच्या पुर्नबांधणीचा प्रस्ताव आहे. स्टेडियमची पुर्नबांधणी झाल्यास क्षमता 60 हजार इतकी होईल. त्यासाठी अंदाजे 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत या स्टेडियमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.