AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: ‘या’ चार कारणांमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना

IND vs PAK: भारताने विजयाने आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. हा सामना भारताने जिंकला, पण त्यामागे विजयाची काय कारण आहेत? ते समजून घेऊया.

IND vs PAK: 'या' चार कारणांमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना
hardik pandya rohit sharmaImage Credit source: BCCI
| Updated on: Aug 29, 2022 | 7:25 AM
Share

मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले होते. कारण या सामन्यात क्रिकेटचा सर्वोच्च रोमांच अनुभवता येतो. कालचा सामना सुद्धा अगदी तसाच झाला. अगदी शेवटच्या षटकात निकाल लागला. ते ही हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) खास स्टाइल मध्ये विजय मिळवून दिला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये रविवारी ही मॅच झाली. भारताने विजयाने आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. हा सामना भारताने जिंकला, पण त्यामागे विजयाची काय कारण आहेत? ते समजून घेऊया.

  1. शानदार गोलंदाजी हे भारताच्या विजयाचं एक कारण आहे. रोहित शर्माने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. पाकिस्तानला 147 धावांवर रोखलं. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वच्या सर्व 10 विकेट घेतल्या.
  2. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात चार विकेट काढल्या. पाकिस्तान विरुद्ध टी 20 क्रिकेट मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा भुवनेश्वर कुमार भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वरने बाबर आजमची विकेट काढून भारताला सर्वात मोठ यश मिळवून दिलं. त्या झटक्यातून शेवटपर्यंत पाकिस्तानी संघ बाहेर आलाच नाही.
  3. रवींद्र जाडेजा या सामन्यात चौथ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याचं या सामन्यात प्रमोशन झालं होतं. टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य असल्याचही त्याने सिद्ध केलं. जाडेजाने शानदार इनिंग खेळून संघाच्या विजयात महत्त्वाच योगदान दिलं. त्याने 29 चेंडूत 35 धावा केल्या. तो शेवटच्या षटकात आऊट झाला.
  4. हार्दिक पंड्याने या सामन्यात मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. भारताला 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता होती. पंड्याने 19 व्या षटकात तीन चौकार मारले. त्यामुळे चेंडू आणि धावांमधल अंतर मोठ्या प्रमाणात कमी झालं. अखेरच्या षटकात 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. त्याने या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गोलंदाजी मध्ये सुद्धा हार्दिकने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तीन विकेट घेतले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!