AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: ‘या’ चार कारणांमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना

IND vs PAK: भारताने विजयाने आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. हा सामना भारताने जिंकला, पण त्यामागे विजयाची काय कारण आहेत? ते समजून घेऊया.

IND vs PAK: 'या' चार कारणांमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना
hardik pandya rohit sharmaImage Credit source: BCCI
| Updated on: Aug 29, 2022 | 7:25 AM
Share

मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले होते. कारण या सामन्यात क्रिकेटचा सर्वोच्च रोमांच अनुभवता येतो. कालचा सामना सुद्धा अगदी तसाच झाला. अगदी शेवटच्या षटकात निकाल लागला. ते ही हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) खास स्टाइल मध्ये विजय मिळवून दिला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये रविवारी ही मॅच झाली. भारताने विजयाने आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. हा सामना भारताने जिंकला, पण त्यामागे विजयाची काय कारण आहेत? ते समजून घेऊया.

  1. शानदार गोलंदाजी हे भारताच्या विजयाचं एक कारण आहे. रोहित शर्माने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. पाकिस्तानला 147 धावांवर रोखलं. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वच्या सर्व 10 विकेट घेतल्या.
  2. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात चार विकेट काढल्या. पाकिस्तान विरुद्ध टी 20 क्रिकेट मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा भुवनेश्वर कुमार भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वरने बाबर आजमची विकेट काढून भारताला सर्वात मोठ यश मिळवून दिलं. त्या झटक्यातून शेवटपर्यंत पाकिस्तानी संघ बाहेर आलाच नाही.
  3. रवींद्र जाडेजा या सामन्यात चौथ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याचं या सामन्यात प्रमोशन झालं होतं. टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य असल्याचही त्याने सिद्ध केलं. जाडेजाने शानदार इनिंग खेळून संघाच्या विजयात महत्त्वाच योगदान दिलं. त्याने 29 चेंडूत 35 धावा केल्या. तो शेवटच्या षटकात आऊट झाला.
  4. हार्दिक पंड्याने या सामन्यात मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. भारताला 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता होती. पंड्याने 19 व्या षटकात तीन चौकार मारले. त्यामुळे चेंडू आणि धावांमधल अंतर मोठ्या प्रमाणात कमी झालं. अखेरच्या षटकात 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. त्याने या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गोलंदाजी मध्ये सुद्धा हार्दिकने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तीन विकेट घेतले.

Follow Us
बीडीडी चाळीतील 864 घरांचे वितरण, फडणविसांच्या हस्ते दिल्या चाव्या!
बीडीडी चाळीतील 864 घरांचे वितरण, फडणविसांच्या हस्ते दिल्या चाव्या!.
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.