AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | सूर्यकुमार यादव याला डच्चू? आशिया कप स्पर्धेसाठी कशी आहे संभावित टीम इंडिया

Asia Cup 2023 Team India Probable Squad | टीम इंडियाच्या आशिया कप मोहिमेला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र अद्याप भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही.

Asia Cup 2023 | सूर्यकुमार यादव याला डच्चू? आशिया कप स्पर्धेसाठी कशी आहे संभावित टीम इंडिया
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 25, 2023 | 3:51 PM
Share

मुंबई | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजवर दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेनंतर उभयसंघात आता एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियात टी 20 सीरिज खेळणार आहे. या टी 20 सीरिजनंतर बहुप्रतिक्षित आशिय कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक हे काही दिवसांआधी जाहीर करण्यात आलं. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा महामुकाबला 2 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे.

आशिया कप स्पर्धेसाठी अजून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. टीम इंडियाचे काही खेळाडू हे सध्या दुखापतीतून सावरुन कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत. त्यामध्ये श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह या तिघांचा समावेश आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. या तिघांच्या फीट होण्याची प्रतिक्षा बीसीसीआय आणि निवड समितीला आहे. त्यामुळे अजून आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र या स्पर्धेसाठी संभावित भारतीय संघ कसा असू शकतो, हे आपण जाणून घेऊयात.

जसप्रीत बुमराह हा गेल्या वर्षभरापासून दुखापतीशी लढतोय. केएलला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली. तर श्रेयस अय्यर हा देखील काही महिन्यांपासून टीममधून दुखापतीमुळे बाहेर आहे. मात्र आता हे तिघे रिकव्हर झालेत. तसेच ते आशिया कपसाठी फिट असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार आहे.

कशी असू शकते संभावित टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर.

आशिया कपबाबत महत्वाची माहिती

यंदा आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे वनडे फॉर्मेटमुसार करण्यात आलंय. अर्थात सामने हे 50 ओव्हर्सचे खेळवण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेश असे एकूण 6 संघ खेळणार आहेत. या सहा संघांची एकूण 2 ग्रुपमध्ये करण्यात आली आहे.

टीम इंडिया, नेपाळ आणि पाकिस्तान या 3 टीम ग्रुप ए मध्ये आहेत. बी ग्रुपमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या टीम्स आहेत. स्पर्धेचं आयोजन हे रॉबिन राउंडनुसार करण्यात आलंय. त्यानुसार प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील 2 संघांसोबत भिडतील. त्यानुसार दोन्ही गटातील टॉप 2 टीम सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर या सुपर 4 राउंडमध्ये प्रत्येक टीम इतर 3 संघांविरुद्ध खेळेल. यातील 2 अव्वल संघ अंतिम फेरीत पोहचतील.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.