AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला आशिया कपसाठी टीम इंडियात नो एन्ट्री! अभिषेकसोबत ओपनिंग कोण करणार?

Asia Cup 2025 Team India Sanju Samson : संजू सॅमसन याने एका वर्षात टी 20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र संजूने गेल्या 5 टी 20I सामन्यांमध्ये फक्त 51 धावाच करता आल्या आहेत.

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला आशिया कपसाठी टीम इंडियात नो एन्ट्री! अभिषेकसोबत ओपनिंग कोण करणार?
Team India Sanju SamsonImage Credit source: PTI
| Updated on: Aug 14, 2025 | 12:54 AM
Share

आगामी आणि बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचं एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने 26 जुलै रोजी वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार यूएईतील एकूण 2 स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. गतविजेत्या भारतीय संघाची आशिया कप स्पर्धेसाठी घोषणा केव्हा केली जाणार? याची प्रतिक्षा आणि उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ता यांनी मोठं विधान केलं आहे. त्यानुसार भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याची आशिया कप स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार नाही.

संजू सॅमसन टी 20i क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. भारतासाठी वर्षभरात टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान हा संजूच्या नावावर आहे. मात्र वाईट बाब अशी की संजूला गेल्या 5 टी 20i सामन्यांमध्ये 60 धावाही करता आल्या नाहीत. संजूने शेवटच्या 5 टी 20i सामन्यांमध्ये 51 धावा केल्या आहेत. त्यामुळे संजूला संघात संधी देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दीप दासगुप्ता काय म्हणाले?

“संजू सॅमसन याने चांगली कामगिरी केली. मात्र भारतात इंग्लंड विरुद्ध त्याला फार संघर्ष करावा लागला. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात कोणत्याही एका मजबूत संघाविरुद्ध खेळलेली ही एकमेव मालिका होती”, असं दीप दासगुप्ता टीओआयसोबत बोलताना म्हणाले.

“शुबमन गिल विराट कोहली याची भूमिका बजावू शकतो. शुबमन या अशा स्पर्धेत शेवटपर्यंत खेळून मोठी धावसंख्या करु शकतो. शुबमनला आयपीएलमधील कामगिरीची पार्श्वभूमी आहे. यूएईमधील संथ खेळपट्टीत असा खेळाडू असायला हवाच” , असंही दासगुप्ता यांनी म्हटलं.

“अभिषेक शर्मा याने ओपनर म्हणून खेळावं. अभिषेकमध्ये सूर गवसल्यावर सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. यशस्वी जैस्वालला संधी मिळणं अवघड आहे. त्यामुळे निवड समितीला संजू सॅमसन आणि जितेश शर्मा मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतात की नाही, हे ठरवावं लागेल”, असंही दासगुप्ता यांनी नमूद केलं.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, तिलक वर्मा, जितेश शर्मा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.