AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: टीम इंडिया दुबईसाठी केव्हा रवाना होणार? मोठी अपडेट समोर

Indian Cricket Team : आशिया कप 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईकडे आहे. त्यामुळे भारतीय संघ यूएईला केव्हा रवाना होणार? जाणून घ्या.

Asia Cup 2025: टीम इंडिया दुबईसाठी केव्हा रवाना होणार? मोठी अपडेट समोर
Abhishek Sharma Varun Suryakumar YadavImage Credit source: Bcci
| Updated on: Aug 19, 2025 | 11:42 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून होती. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 19 ऑगस्टला मुंबईत आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. त्यानुसार सूर्यकुमार यादव आशिया कप स्पर्धेत नेतृत्व करणार आहे. तर वर्षभरानंतर कमबॅक करणाऱ्या शुबमन गिल याला उपकर्णधार म्हणून सूत्र देण्यात आली आहेत. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना आणखी एक प्रश्न पडला आहे.

आशिय कप स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. अबुधाबी आणि दुबईतील स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सर्व सामने होणार आहेत. स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला. त्यानंतर आता भारतीय संघ यूएईला केव्हा रवाना होणार? याची उत्सूकता लागून आहे.

टीम इंडिया दुबईसाठी केव्हा निघणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी 4 किंवा 5 सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होऊ शकते. तसेच भारतीय संघ या स्पर्धेआधी कोणत्याही सराव शिबीरात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय खेळाडू आयपीएलच्या 18 व्या हंगामानंतर आशिया कप स्पर्धेत टी 20 सामने खेळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या लोकप्रिय फॉर्मेटमध्ये चौकार-षटकारांची फटकेबाजी पाहायला मिळणार असल्याचं निश्चित आहे.

टीम इंडियाचं मिशन टी 20I वर्ल्ड कप 2026

दरम्यान टीम इंडिया या स्पर्धेतून आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 च्या तयारीला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघात संधी मिळालेल्या प्रत्येक खेळाडूचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

भारताच्या मोहिमेला 10 सप्टेंबरपासून श्रीगणेशा

दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर भारतीय संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार आहे. टीम इंडिया पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध भिडणार आहे. दुसरा सामना हा 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. तर भारत साखळी फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना ओमान विरुद्ध खेळणार आहे.

श्रेयस अय्यरला नो एन्ट्री

निवड समितीने आशिया कप स्पर्धेसाठी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर याला संधी दिली नाही. त्यामुळे चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच यशस्वी जैस्वाल याला मुख्य संघाऐवजी राखीव म्हणून संधी देण्यात आली आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.