AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, आता स्पर्धेचं स्वरूप असं काही असेल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व वाढलं आहे. दिग्गज खेळाडू देखील स्पर्धांमध्ये खेळताना दिसत आहेत. आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या.

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, आता स्पर्धेचं स्वरूप असं काही असेल
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केला मोठा बदल, आता सामन्यांचं स्वरूप असं काही असेलImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 23, 2025 | 3:42 PM
Share

बीसीसीआयने गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेट रुपडं पालटलं आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटला पुन्हा वैभव प्राप्त झालं आहे. दिग्गज खेळाडू देखील स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. असं असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा बदल बीसीसीआयने केला आहे. हा निर्णय देशांतर्गत वनडे क्रिकेट स्पर्धांसाठी असणार आहे. बीसीसीआय वनडे क्रिकेटचा फॉर्मेट बदलणार आहे. आता देशांतर्गत वनडे स्पर्धेत तु्म्हाला प्लेट ग्रुप सिस्टम पाहायला मिळेल. या नव्या पर्वापासून हा बदल लागू होणार आहे. या नियमाची सुरुवात दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून होणार आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार ठआहे. पहिला सामना नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन, दुसरा सामना सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोनमध्ये होईल.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विजय हजारे ट्रॉफी असो की वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धा, अंडर 23 पुरुष राज्य ए ट्रॉफी वनडे स्पर्धा असो.. या स्पर्धेतील सर्व चार संघ चार एलिट आणि एक प्लेट गटात विभागले जातील. तळातील सहा संघ प्लेट गटात असतील. यापूर्वी प्रत्येक पर्वात प्लेट गटातील दोन संघ वर जायचे. तर दोन संघ खाली यायचे. त्यानंतर एक संघाला वर किंवा खाली जायचा. या बदलाच्या माध्यमातून देशांतर्गत क्रिकेट आणखी भक्कम करण्याचा हेतू बीसीसीआयचा आहे. यामुळे प्रत्येक संघाची पारख होईल. तसेच चांगल्या खेळाडूंची निवड करणं सोपं होईल.

टीम इंडिया 2026 या वर्षात काही महत्त्वाचे वनडे सामने खेळणार आहे. या निर्णयामुळे काही खेळाडूंनी राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते.या आधी बीसीसीआयने रणजी स्पर्धेत एलीट आणि प्लेट ग्रुप फॉर्मेटमध्ये सामने खेळवण्याचा निर्णय घेतला होता. रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धा याच फॉर्मेटमध्ये खेळली जाईल. या स्पर्धेची सुरुवात ऑक्टोबरपासून होणार आहे. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला टी20 स्पर्धेतही बीसीसीआयने बदल केला आहे. येथे बाद फेरीऐवजी सुपर लीग स्टेज आणण्याचा निर्णय घेतला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.