AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळण्याचे खरे कारण दुखापत नाही तर…! बीसीसीआयने रोहित शर्माबाबतही घेतला मोठा निर्णय

चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया जसप्रीत बुमराहशिवाय घोषित केली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. पण आता वेगळंच कारण पुढे आलं आहे.

बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळण्याचे खरे कारण दुखापत नाही तर...! बीसीसीआयने रोहित शर्माबाबतही घेतला मोठा निर्णय
| Updated on: Feb 15, 2025 | 6:38 PM
Share

भारतीय संघात जसप्रीत बुमराहने आपलं एक वेगळं असं महत्त्व प्रस्थापित केलं आहे. बुमराह आपल्या भेदक गोलंदाजीने कधीही सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतो. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने आपल्या भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापत झाली आणि त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावं लागलं. पण स्पर्धेत न खेळण्याचं वेगळंच कारण आता समोर आलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय जसप्रीत बुमराहकडे कसोटी कर्णधार म्हणून पाहात आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वात जसप्रीत बुमराहकडे संघाची सूत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळवून कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात स्थान दिलं नसल्याचं बोललं जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघातील खेळाडूंवर शेवटची मोहोर लावण्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या पाठिच्या दुखापतीचं स्कॅनिंग केलं गेलं. एनसीएने स्कॅन रिपोर्ट पाहिल्यानंतर कोणतीही समस्या नसल्याचं स्पष्ट केलं. पण बुमराहने अजून गोलंदाजी सुरु केली नव्हती आणि फक्त एका आठवड्याचा अवधी शिल्लक होता. त्यामुळे एनसीएने चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळवायचं की नाही याचा निर्णय मुख्य निवडकर्ते अजित आगरकर याच्यावर सोडला होता. अजित आगरकरने टीम इंडियाचं भविष्य विचार करून रिस्क न घेण्याचा निर्णय घेतला. कारण जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. टीम मॅनेजमेंट त्याचा संघाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करत आहे.

दुसरीकडे, बीसीसीआयने रोहित शर्माबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय एकीकडे जसप्रीत बुमराहचा कसोटी कर्णधार म्हणून विचार करत आहे. तर रोहित शर्माला कसोटी संघातून डच्चू देणार असल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, जून जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नसेल. म्हणजेच रोहित शर्माला कसोटी संघात स्थान मिळणं कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माचं कसोटी करिअर संपल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.