AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ तारखेला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार!

Icc World Cup 2023 | आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.

World Cup 2023 | अखेर प्रतिक्षा संपली, 'या' तारखेला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार!
| Updated on: Aug 20, 2023 | 8:56 PM
Share

मुंबई | आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या क्रिकेटच्या महाकुंभासाठी अर्थात वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. तर इतर 8 संघांनी अजून घोषणा केलेली नाही. बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा करणार, हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याकडून विचारला जात आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. वर्ल्ड कपआधी टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. या आशिया कपसाठी 21 ऑगस्टला बीसीसीआय टीम इंडिया जाहीर करणार आहे. या आशिया कपसोबतच वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. मात्र महत्वाची बाब म्हणजे आशिया कपसाठी 17 सदस्यीय स्क्वॉड जाहीर केला जाणार आहे.

आयसीसी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर करण्याची 5 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे बीसीसीआयला 5 सप्टेंबरपर्यंत टीम इंडियाच्या खेळाडूंची नावं द्यावी लागतील. मात्र 27 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक क्रिकेट बोर्डाला या नावांमध्ये बदल करता येईल. म्हणजे टीममध्ये एखाद्याला काढून त्याच्या जागी दुसऱ्याला संधी देता येईल. मात्र तो बदल 27 सप्टेंबरपर्यंतच करता येईल.

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याआधी नवी दिल्लीत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक होणार आहे. यानंतर बीसीसीआय 21 ऑगस्टला भारतीय संघ जाहीर करेल. बीसीसीआय या सोबतच वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करु शकते.

आशिया कपला केव्हापासून सुरुवात?

आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात होणार आहे तर टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना हा 2 सप्टेंबरला होणार आहे. तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठी हार्दिक पंड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकऐवजी जसप्रीत बुमराह याला ती जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला
पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! राऊतांचा खोचक टोला.
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;
24 तासांपासून महाराष्ट्राच्या 'विकासा'चा मार्ग बंद;.
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?
शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?.
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?
महाजनांच्या कारभारावरुन नाशिक भाजपात कलह?.
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! गटारीच्या पाण्याने धुतली फळं; वसई-विरारमधला व्हिडीओ व्हायरल.
कांद्याचे दर कोसळले, कवडीमोल भावाने शेतकरी संतापले
कांद्याचे दर कोसळले, कवडीमोल भावाने शेतकरी संतापले.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरु
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरु.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महत्वाची अपडेट! नेमकं काय घडलं?
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महत्वाची अपडेट! नेमकं काय घडलं?.
मला का व्हिलन केलं याची मला...; टीकेवरुन तटकरेंची प्रतिक्रिया
मला का व्हिलन केलं याची मला...; टीकेवरुन तटकरेंची प्रतिक्रिया.
पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवारांना 'क्लीन चिट'
पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवारांना 'क्लीन चिट'.