AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC फायनल मॅचपूर्वी सचिनचा विराटला महत्त्वाचा सल्ला तर पुजाराबाबत केलं ‘हे’ विधान, काय म्हणाला क्रिकेटचा देव?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) सामन्याला सुरुवात होण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे. या जागतिक कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असणारे भारत (India) आणि न्यूझीलंड(NewZealand) हे संघ आमने-सामने असणार आहेत.

WTC फायनल मॅचपूर्वी सचिनचा विराटला महत्त्वाचा सल्ला तर पुजाराबाबत केलं 'हे' विधान, काय म्हणाला क्रिकेटचा देव?
Sachin Tendulkar
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 12:34 PM
Share

मुंबई : बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीनला सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (NewZealand) हे दोन्ही संघ सामन्यासाठी तयार झाले असून दोन्ही संघाच्या खेळाडूंना क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज महत्त्वाचे सल्ले देत आहेत. क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील भारतीय संघाला महत्त्वाचे सल्ले दिले असून त्याने कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मोलाचा सल्ला दिला आहे. सोबतच फलंदाज चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत यांचीही स्तुती करत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. (Before WTC Final Sachin Tendulkar gave advice to Virat Kohli CheteShwar Pujara and Other Team India Players )

सचिन तेंडुलकरने आज तकच्या सलाम ए क्रिकेट या विशेष कार्यक्रमात दिलेल्या माहितीत विराटला WTC Final सामन्यात जपूण खेळत फ्रंट फुट डिफेन्सवर अधिक लक्ष द्यायला सांगितलं आहे. सचिनने दिलेल्या सल्ल्यानुसार अंतिम सामन्यात वापरला जाणारा ड्युक बॉल सुरवातीला स्लो जातो. त्यामुळे कर्णधार विराटने जपून खेळत सुरुवातीला डिफेन्स करणे गरजेचे आहे. असं सचिन म्हणाला. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलला (Shubhman Gill) देखील सचिनने फ्रंट फुट डिफेन्स करण्याचा सल्ला दिला आहे.

इंग्लंडच्या वातावरणाचा अंदाज घेणं महत्त्वाचं

सचिनने फलंदाजाना सल्ला देताना सांगितले की, फलंदाजाना सुरुवातीला सांभाळून खेळणे गरजेचे आहे. कारण इंग्लंडच्या सध्याच्या वातावरणात बॉल धिम्यागतीने जातो. जास्त स्वींगदेखील होतो. त्यानंतर जस जसं ऊन वाढतं, खेळ बदलण्यास सुरुवात होते. त्यामुळे जेव्हा बॉल जास्च स्वींग होतो तेव्हा फलंदाजानी सांभाळून डिफेन्सीव खेळणे महत्त्वाचे आहे.

पंत आणि पुजाराचं कौतुक

सचिन तेंडुलकर फलंदाज चेतेश्वर पुजाराबद्दल विचारणा केल्यावर म्हणाला, ‘पुजारा एक अप्रतिम फलंदाज आहे. त्याने आपला खेळ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातच दाखवला होता. पुजाराच्या स्ट्राइक रेटचा विचार न करता त्याच्या कन्सिटन्सीकडे पाहण महत्त्वाच आहे.  5 दिवसांच्या सामन्यात त्याच्यासारख्य खेळाडूच महत्त्व अधिक असतं.’ तसंच पंतबद्दल सचिन म्हणाला, ‘ऋषभ पंत असा फलंदाज आहे, जो केवळ एका तासात सामना पलटवू शकतो. अनेकजण त्याच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्न उठवतात. पण तो महान फलंदाज गिलक्रिस्टप्रमाणे खेळतो.’

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

WTC Final 2021 : प्रत्येक पीचवर विराट कोहलीची बॅट कशी बोलते? सुनील गावस्करांनी गुपित सांगितलं

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(Before WTC Final Sachin Tendulkar gave advice to Virat Kohli CheteShwar Pujara and Other Team India Players)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली