AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: पठ्ठ्या केवळ 11 चेंडूच खेळला, 2 चौकार ठोकत गोलंदाजाचा घाम काढला

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीकडून भारतीय क्रिकेट जगताला मोठ्या आशा आहे. त्यामध्ये देशाचा भावी ऑलराऊंडर लपल्याचा आणि तो भारतीय संघाचा हुकमी एक्का ठरण्याचे अनेक गुण आहेत. पण त्याला बिहारला विजय मिळवून देता आलेला नाही.

Vaibhav Suryavanshi: पठ्ठ्या केवळ 11 चेंडूच खेळला, 2 चौकार ठोकत गोलंदाजाचा घाम काढला
वैभव सूर्यवंशी
| Updated on: Dec 06, 2025 | 4:24 PM
Share

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला हैदराबाद विरोधातील सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची संधी होती. पण त्याला सातत्य टिकवता आले नाही. आपल्या फटकेबाजीने आणि दमदार शॉट्ससाठी सूर्यवंशी वैभवाच्या शिखारावर आहे. एलिट ग्रुप बीच्या सामन्यात बिहारसाठी त्याला मैदानावर फार काळ टिकता आले नाही. तो केवळ 11 चेंडू खेळला. तो मैदानावर असल्याने गोलंदाज त्याला झटपट बाद करण्यासाठी तयारीतच होते. पण त्याने दोन तडाखेबंद चौकार लावताच गोलंदाजांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. याला बाद केले नाहीतर हा धावांचा डोंगर उभारले हे हैदराबादने जाणले होते. त्यामुळे वैभवला त्यांनी धावपट्टीवर रमूच दिले नाही. तो 11 चेंडूत 11 धावा काढुन बाद झाला. यापूर्वी वैभवने गोवा विरोधात चांगली कामगिरी केली होती. त्याने 46 धाव केल्या होत्यात तर महाराष्ट्र संघाविरोधात त्याने सरस कामगिरी बजावली होती. वैभवने नाबाद 108 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे वैभवची लय आणि सूर या हैदराबादविरोधातही कायम राहतील अशी भीती होती. पण तो बाद होताच हैदराबाद संघातील गोलंदाजांनी जल्लोष केला. पण तो जोपर्यंत धावपट्टीवर होता, तोपर्यंत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना घाम गाळावा लागला.

वैभवचीच पहिली विकेट

कोलकत्ता येथील जाधवपूर मैदानावर हैदराबाद विरुद्ध बिहार असा सामना झाला. नाणेफेक जिंकून बिहारने फलंदाजी स्वीकारली. बिहारसाठी वैभाव सूर्यवंशीने कर्णधार साकिबुल गणी याच्यासह धावपट्टीवर दीर्घकाळ थांबण्याचा निर्धार केला. पण फलकावर 28 धावा झळकताच तो बाद झाला. वैभवला लागलीच तंबूत परत पाठवण्यात हैदराबादचे खेळाडू यशस्वी झाले.

वैभव सूर्यवंशीने एशिया कप रायझिंग स्टारमध्ये दमदार खेळी केली होती. या टुर्नामेंटमध्ये इंडिया अ संघासाठी वैभवने 4 सामन्यात 243.88 च्या स्ट्राईक रेटनुसार 239 धावा चोपल्या होत्या. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने युएईविरोधातील सामन्यात 42 चेंडूत 144 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याचे नाव जागतिक स्तरावर झाले. त्यामुळे सूर्यवंशी आता बिहारला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी अशी तुफानी खेळी खेळल का? आणि बिहारला पहिला विजय मिळवून देईल का, याची चर्चा होत आहे. गुणतालिकेत बिहार सध्या रसातळाला आहे. त्याला बाहेर आणण्यासाठी संघाच्या कर्णधारासह उपकर्णधार वैभववर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली