AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane: ठरलं! निवड समिती रहाणे, पुजाराला करणार Thank You, हे दोन फलंदाज घेणार जागा

मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत (South Africa test Series) झालेल्या 2-1 अशा पराभवानंतर निवड समिती काही मोठे निर्णय घेऊ शकते. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) या दोघांना संघातून डच्चू मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. अनुभवाने कमी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा पराभव केला. रहाणे आणि पुजारा हे दोघेही दक्षिण आफ्रिका दौऱ्याला […]

Ajinkya Rahane: ठरलं! निवड समिती रहाणे, पुजाराला करणार Thank You, हे दोन फलंदाज घेणार जागा
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्याडावात फेल गेल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. 'पुराने' हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. रहाणेने चालू दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 22.66 च्या सरासरीने फक्त 136 धावा केल्या. पुजाराने 20.66 च्या सरासरीने 124 धावा केल्या. भारतीय क्रिकेटमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर इतकी संधी कोणाला मिळालेली नाही. या दोघांमुळे काही प्रतिभावान युवा खेळाडू बेंचवर बसले आहेत आणि त्यांच्या हातातून वेळ आणि संधी दोन्ही निसटत चाललीय.
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 7:04 PM
Share

मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत (South Africa test Series) झालेल्या 2-1 अशा पराभवानंतर निवड समिती काही मोठे निर्णय घेऊ शकते. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) या दोघांना संघातून डच्चू मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. अनुभवाने कमी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचा पराभव केला. रहाणे आणि पुजारा हे दोघेही दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधीपासूनच रडारवर होते. दोघांनी एक अर्धशतक वगळता दक्षिण आफ्रिकेत विशेष कामगिरी केलेली नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार मायदेशात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंजाबचा शुभमन गिल आणि हनुमा विहारीला निवड समिती संधी देऊ शकते. निवड समितीच्या मनात काय असेल? विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटन रहाणे आणि पुजाराचा शेवटपर्यंत बचाव केला. पण काल केपटाऊनमधल्या पराभवानंतर विराट कोहलीला पत्रकार परिषदेत दोघांच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याच्याकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते. “इथे बसून मी ठरवू शकत नाही. ते निवड समितीचे काम आहे. आम्ही पुजारा आणि रहाणेचं समर्थन केलं. पण निवड समितीच्या मनात काय असेल? त्याबद्दल मी बोलू शकत नाही” असं विराट म्हणाला.

रिपोर्टसनुसार निवड समिती कसोटी क्रिकेटमध्ये मोठे बदल करु शकते. 25 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध मायदेशात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी मिळणार नाही. पीटीआयने हे वृत्त दिल्याचं स्पोटर्स टायगर वेबसाइटने म्हटलं आहे.

कधीपासून खेळतायत कसोटी संघात? शुभमन गिल मधल्या फळीत खेळणार आहे. दुसऱ्याजागेवर हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल. रोहित शर्मा सुद्धा या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल. तो सलामीवीर मयंक अग्रवालची जागा घेईल. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला वगळलं, तर कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होईल. अजिंक्य रहाणे आणि पुजारा मागच्या दहावर्षांपासून भारताच्या कसोटी संघाचा भाग आहेत.

(Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane set to be dropped for Test series against Sri Lanka Shubman Gill will bat in middle order)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली