AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket | आजपासून चिन्नास्वामी स्टेडियम प्रकाशझोतात, भारत-श्रीलंकेची दुसरी कसोटी, 71व्या शतकाची प्रतीक्षा संपणार?

बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियम आजपासून प्रकाशझोतात असणार आहे. त्याला दोन विशेष गोष्टी आहते. एक म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना बंगळुरुच्या मैदानात रंगणार आहे. तर दुसरी गोष्ट विराटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न त्याला पूर्ण करता येऊ शकतं.

Cricket | आजपासून चिन्नास्वामी स्टेडियम प्रकाशझोतात, भारत-श्रीलंकेची दुसरी कसोटी, 71व्या शतकाची प्रतीक्षा संपणार?
भारत-श्रीलंकेची दुसरी कसोटी, आजपासून चिन्नास्वामी स्टेडियम प्रकाशझोतातImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 10:03 AM
Share

बंगळूरु : आजपासून चिन्नास्वामी स्टेडियण (Chennamma stadium) प्रकाशझोतात असणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना बंगळुरुच्या (Bengaluru) मैदानात आज रंगणार आहे. आजपासून बंगळुरुच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या दिवस रात्र कसोटी (Day Night Test) सामन्यात विशेष म्हणजे 100 टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. तर यात एक दुग्धशर्करा योग आहे. विराट कोलहीनं (Virat kohli)कारकीर्दीतील 70वं शतक झळकावलंय. ते देखील प्रकाशझोतातील कसोटीमध्ये. नोव्हेंबर 2019मध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारतानं एक डाव आणि 46 धावांनी यशोशिखर गाठलं होतं. त्या सामन्यात विराटनं 136 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर 28 डावांमध्ये विराट कसोटी शतकापासून दूर राहिला होता. आता यापैकी 6 डावांमध्ये कोहलीनं 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारीत केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभारलेली 79 धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली. विराटनं मोहालीमध्ये सामन्यात 45 धावा काढल्या होत्या. आता श्रीलंकेसमोर विराटला त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल वातावरण आहे.

अक्षरचं पारडं जड

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामन्यासाठी 11 खेळाडूंची निवड करताना फिरकीपटू जयंत यादवच्या ऐवजी अष्टपैलू अक्षर पटेल किंवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. मोहालीत श्रीलंकेचे फलंदाज झगडत असताना फिरकीपटू जयंत यादव हा प्रभाव पाडू शकला नाही. जयंतला दोन डावांच्या 17 षटकांमध्ये एकही बळी मिळाला नाही. तर दुसरीकडे अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये अक्षर पटेल यानं 11 बळी मिळवले होते. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामन्यात अक्षरचं पारडं जड मानलं जातंय.

लाहिरू कुमाराची उणीव

अँजेलो मॅथ्यूजही मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या डावामध्ये पथुम निसंकाने नाबाद 61 धावा काढल्या होत्या. तर दुसरीकडे निरोशान डिक्वेलानं नाबाद 51 धावा त्यावेळी काढल्या. मोहालीमध्ये चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या आणि अजिंक्य रहाणेच्या पाचव्या स्थानावर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी दावेदारी पक्की केली आहे. तर दुसरीकडे गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेला वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची उणीव भासत आहे.

इतर बातम्या

Video: गेला गेला गेला, ऐ सोड अन् गेला, उसानं ओव्हरलोड झालेला ट्रक कालव्यात कोसळतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

दिल्लीत भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू, 30 झोपड्या जळून खाक

करदात्यांना दिलासा; मार्चमध्ये शनिवारी प्राप्तिकर कार्यालये उघडी राहणार

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.