AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टी 20i मालिकेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा, कुणाला संधी?

T20i Tri Series 2025 : पाकिस्तानमध्ये होणाऱ्या टी 20i ट्राय सीरिजआधी श्रीलंका क्रिकेट टीमच्या 2 खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला आहे. या 2 खेळाडूंनी पाकिस्तान सोडलं आहे.

Cricket : टी 20i मालिकेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा, कुणाला संधी?
Pakistan vs Sri LankaImage Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images
| Updated on: Nov 18, 2025 | 12:21 AM
Share

यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमने श्रीलंकेला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं. त्यानंतर आता पाकिस्तान, श्रीलंका आणि झिंबाब्वे यांच्यात टी 20i ट्राय सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला मंगळवार 18 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र मालिकेला काही तास शिल्लक असताना श्रीलंका क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. या टी 20i ट्राय सीरिजआधी श्रीलंकेच्या 2 खेळाडूंनी तडकाफडकी पाकिस्तान सोडलं आहे. या खेळाडूंनी असा निर्णय का घेतला? हे सविस्तर जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान इस्लामाबादमध्ये स्फोट झाला. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणामुळे तात्काळ पाकिस्तान सोडण्याचा निर्णय केला होता. मात्र पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेच्या खेळाडूंना सुरक्षेची हमी दिली. त्यानंतर खेळाडूंनी थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर आता ट्राय सीरिजच्या तोंडावर 2 खेळाडू मायदेशी परतले आहेत.

श्रीलंकेचे 2 खेळाडू मायदेशी

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथ फर्नांडो आणि कॅप्टन चरित असलंका या दोघांनी पाकिस्तान सोडलं आहे. असिथ आणि चरित या दोघांनी वैद्यकीय कारणामुळे पाकिस्तान सोडलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे. या दोन्ही खेळाडूंची तब्येत बरी नसल्याने त्यांना मायदेशी बोलवण्यात आल्याचं क्रिकेट बोर्डाने सांगितलंय.

आता कॅप्टन कोण?

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने चरित असलंका याच्या जागी दासुन शनाका याला ट्राय सीरिजसाठी नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. तर असिथ फर्नांडो याच्या जागी वेगवान गोलंदाज पवन रत्नायके याचा समावेश केला आहे.

ट्राय सीरिजबाबत थोडक्यात

दरम्यान ट्राय सीरिजमध्ये एकूण 3 संघांमध्ये 18 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकूण 7 टी 20i क्रिकेट सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

ट्राय सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध झिंबाब्वे

दुसरा सामना, 20 नोव्हेंबर, श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे

तिसरा सामना, 22 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

चौथा सामना, 23 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध झिंबाब्वे

पाचवा सामना, 25 नोव्हेंबर, श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे

सहावा सामना, 27 नोव्हेंबर, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका

अंतिम सामना, 29 नोव्हेंबर

मालिकेतील सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

पाकिस्तान आणि झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20i ट्राय सीरिजसाठी श्रीलंकेचा सुधारित संघ : दासुन शनाका (कॅप्टन) पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिल मिशारा, कामिंडु मेंडिस, भानुका राजपक्षे, जेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, महीश तीक्षाना, दुशान हेमंथा, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, ईशान मलिंगा आणि पवन रतनायके.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.