AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास भाग पाडलं? प्रशिक्षकाचं खळबळजनक विधान

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना क्रीडाविश्वात खळबळ उडाली. एका दिग्गज खेळाडूने इतक्या तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण ही निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी केला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास भाग पाडलं? प्रशिक्षकाचं खळबळजनक विधान
विराट कोहलीImage Credit source: PTI
| Updated on: May 12, 2025 | 9:31 PM
Share

विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीने वयाच्या 36व्या वर्षी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण विराट कोहलीच्या फिटनेसबाबत काहीचं चिंता नव्हती. त्यामुळे रोहित शर्मा पाठोपाठ त्याने निवृत्ती घेतल्याने आश्चर्य वाटत आहे. असं अचानक निवृत्ती घेण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण पुढच्या महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीने खळबळ उडाली आहे. त्याच्या निवृत्तीमागे काहीतरी गडबड असल्याचं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. अनेकांनी याबाबत आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनीही याबाबत धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या मते, विराट कोहलीच्या डोक्यात निवृत्तीचा विचार नव्हता, त्याचे संपूर्ण लक्ष इंग्लंड मालिकेवर होतं. सरनदीप सिंग यांच्या विधानाने क्रीडाविश्वात वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. कारण विराट कोहली या वर्षाच्या सुरुवातील रणजी सामना खेळण्यास दिल्लीला आला होता. त्याने सरनदीप सिंग यांच्यासोबत बराच वेळ व्यत्त केला होता.

विराटच्या निवृत्तीबद्दल दिल्लीच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा

सरनदीप सिंग यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, ‘काही आठवड्यांपूर्वी मी विराट कोहलीशी बोललो आणि इंग्लंड मालिकेची तयारी करण्यासाठी काउंटी क्रिकेट खेळेल का? असं विचारलं. तेव्हा विराट कोहली म्हणाला होता की, इंग्लंडमध्ये भारत अ संघासाठी दोन सामने खेळेन.’ सरनदीप सिंग यांच्या वक्तव्यानुसार विराट कोहली इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता, असं दिसत आहे. सरनदीप सिंग यांच्या मते, विराटने कसोटी फॉरमेट सोडण्याची जराही इच्छा व्यक्त केली नव्हती. उलट इंग्लंड मालिकेसाठी तयारी करत होता.

सरनदीप सिंग पुढे म्हणाले की, ‘विराट कोहलीने मला सांगितलं होतं की इंग्लंड मालिकेत 4-5 शतकं करायची आहेत. जसं मी 2018 मध्ये केलं होतं. तेव्हा रणजी सामने खेळण्यासाठी आला होता.’ इतकंच काय तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फक्त एकच शतक केल्याने विराट कोहली निराश होता, असंही त्यांनी पुढे सांगितलं. रणजी स्पर्धेवेळी विराट फक्त इंग्लंड कसोटी मालिकेबाबत चर्चा करायचं असं देखील त्यांनी सांगितलं. सरनदीप सिंगच्या यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विराट कोहलीचे चाहते या निवृत्तीवर संशय व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे, विराट कोहलीने आरसीबी पॉडकास्टला एक मुलाखात दिली होती. त्यात त्याने आपल्या निवृत्तीवर भाष्य केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, ‘घाबरू नका,मी काहीच घोषणा करणार नाही. आतापर्यंत सर्व काही ठीक आहे. मला अजूनही खेळायला आवडतं.’ इतकंच काय तर मोठे काही करण्याचा मनात जराही विचार नाही. फक्त क्रिकेट आनंद घेऊन खेळायचं आहे.

Follow Us
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच
मोठी बातमी! नाशिकच्या कुंभमेळ्यात गुजराती ठेकेदारांना... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ!
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्यावर जबाबदारी
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्...
6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून राऊतांचा...
Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास...
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा...
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा झाला सुरू
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?