AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs BANA | निशांत सिंधू यांचा बांगलादेशला जोरदार ‘पंच’, टीम इंडियाची फायनलमध्ये रुबाबदार एन्ट्री

India A vs Bangladesh A Semi Final 2 | टीम इंडिया ए ने बांगलादेशवर 51 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

INDA vs BANA | निशांत सिंधू यांचा बांगलादेशला जोरदार 'पंच', टीम इंडियाची फायनलमध्ये रुबाबदार एन्ट्री
| Updated on: Jul 21, 2023 | 9:46 PM
Share

कोलंबो | एमर्जिंग एशिया कप 2023 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया ए ने बांगलादेश ए वर 51 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आता रविवारी 23 जुलै रोजी एशिया कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये महामुकाबला पार पडणार आहे.

सामन्याबाबत थोडक्यात

बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाची सुरुवात आश्वासक झाली. मात्र त्यानंतर बांगलादेशने ठराविक अंतराने टीम इंडियाला झटके द्यायला सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाची बिकट स्थिती झाली. मात्र कॅप्टन यश धूल याच्या निर्णायक अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 49.1 ओव्हरमध्ये 211 धावा केल्या.

यश धूल याने टीम इंडियाकडून सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. अभिषेख शर्मा याने 34 धावांची खेळी केली. साई सुदर्शन आणि मानव सुथार या दोघांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. निकीन जोन्स याने 17, राजवर्धन हंगरगेकर याने 15 आणि रियान पराग याने 12 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी निराशा केली. बांगलादेशकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 6 जणांनी किमान 1 आणि कमाल 2 विकेट्स घेतल्या.

बांगलादेशची बॅटिंग

212 धावांचं पाठलाग करताना बांगलादेशची जबरदस्त सुरुवात झाली. सलामी जोडीने 70 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला गुंडाळायला घेतलं आणि ऑलआऊट केलं. चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशने भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. तांजिद हसन याने सर्वाधिक 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद नईम याने 38 धावा जोडल्या. कॅप्टन सैफ बहसन याने 22 तर महमुदल जॉय 20 याने रन्स केल्या. मेहदी हसन 12 धावा करुन माघारी परतला. तर उर्विरत फलंदाजांना भारतीय बॉलर्सनी झटपट आऊट केलं.

टीम इंडियाकडून निशांत सिंधू याने 5 विकेट्स घेतल्या. मानव सुथार याने 3 जणांना मैदानाबाहेर पाठवलं. तर युवराजसिंह आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

भारत-पाक महाअंतिम सामना

दरम्यान आता रविवारी 23 जुलै रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कपसाठी महामुकाबला होणार आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला 60 धावांनी पराभूत करत चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर टीम इंडिया ए ची 2013 पासून अंतिम फेरीत पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

टीम इंडिया ए | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधु, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, युवराजसिंह डोडिया आणि राजवर्धन हंगरगेकर.

टीम बांगलादेश ए | सैफ हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तंजीद हसन, जाकिर हसन, महमूदुल हसन जॉय, सौम्य सरकार, अकबर अली (विकेटकीपर), महेदी हसन, रकीबुल हसन, तंजीम हसन साकिब आणि रिपन मोंडोल.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.