AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs BANA | यश धुल याचं झुंजार अर्धशतक, बांगलादेशला विजयासाठी 212 धावांचं आव्हान

India A vs Bangladesh A Semi Final 2 | टीम इंडिया ए ने बांगलादेश एसमोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान ठेवले आहे.

INDA vs BANA | यश धुल याचं झुंजार अर्धशतक, बांगलादेशला विजयासाठी 212 धावांचं आव्हान
| Updated on: Jul 21, 2023 | 6:11 PM
Share

कोलंबो | कॅप्टन यश धूल याच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडिया ए ने एमर्जिंग एशिया कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशसमोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाला दुर्देवाने संपूर्ण 50 ओव्हर खेळता आल्या नाहीत. मात्र यशने अखेरपर्यंत झुंज देत एकाकी खिंड लढवली. टीम इंडिया ए 49.1 ओव्हरमध्ये 211 धावांवर ऑलआऊट झाली. यश धूल याने 66 धावांची निर्णायक खेळी केली.

कोण मारणार फायनलमध्ये धडक?

यश धूलने लाज राखली

बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची सावध सुरुवात झाली. टीम इंडियाला गेल्या सामन्यात विजय मिळवून देणारा शतकवीर साई सुदर्शन याच्या रुपात पहिला झटका लागला. त्यानंतर बांगलादेशने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. बांगलादेश गोलंदाजांनी एकही जोडीला मोठी भागीदारी करुन दिली नाही. साई सुदर्शन 21, अभिषेक शर्मा 34, निकीन जोस 17, निशांत सिंधू 5, रियान पराग 12, ध्रुव जुरेल 1 आणि हर्षित राणा 9 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 36. 5 ओव्हमध्ये टीम इंडियाची 7 आऊट 137 अशी नाजूक स्थिती झाली होती.

एका बाजूला विकेट जात होते. तर कॅप्टन यश धूल खिंड लढवत होता. यश आणि मानव सुथार या दोघांनी आठव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. या दरम्यान यशने लिस्ट ए करियरमधील दुसरं द्विशतक पूर्ण केलं. या जोडीकडून टीम इंडिया ए ला अपेक्षा होती. मात्र मानव सुथार चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. मानवने निर्णायक 21 धावा केल्या. त्यानंतर राजवर्धन हंगरगेकर याने टॉप गिअर टाकत 1 सिक्स आणि 1 फोर ठोकून 2 बॉलमध्ये 10 धावा केल्या. मात्र हंगरगेकर फटकेबाजीच्या नादात 15 रन्स करुन आऊट झाला.

आता शेवटची विकेट होती आणि मोजून 19 चेंडूंचा खेळ बाकी होता. पण टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. यश 50 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कॅच आऊट झाला आणि टीम इंडियाचा डाव आटोपला. यश धूलने 85 बॉलमध्ये 6 फोरसह 66 रन्स केल्या.

बांगलादेशकडून मेहदी हसन, तंजिम हसन आणि राकिबूल हसन या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रिपून मोंडोल, कॅप्टन सैफ हसन आणि सौम्य सरकार या तिघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

टीम इंडिया ए | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधु, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, युवराजसिंह डोडिया आणि राजवर्धन हंगरगेकर.

टीम बांगलादेश ए | सैफ हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तंजीद हसन, जाकिर हसन, महमूदुल हसन जॉय, सौम्य सरकार, अकबर अली (विकेटकीपर), महेदी हसन, रकीबुल हसन, तंजीम हसन साकिब आणि रिपन मोंडोल.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.