AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : टीम इंडियाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, शुबमसेनेची ऐतिहासिक कामगिरी, नक्की काय?

England vs India Test Series : भारतीय कसोटी संघाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचही सामन्यात एकूण 12 शतकं झळकावली. यासह भारतीय संघाने विश्व विक्रमाची बरोबरी केली.

ENG vs IND : टीम इंडियाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, शुबमसेनेची ऐतिहासिक कामगिरी, नक्की काय?
Indian Cricket Team National AnthemImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 03, 2025 | 6:28 PM
Share

टीम इंडिया इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. भारतासमोर लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येत असलेला पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचं आव्हान आहे. या मालिकेत भारतीय संघाने बॅटिंगने अफलातून कामगिरी केली. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत खोऱ्याने धावा केल्या. भारताने यासह एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

भारतीय संघातील अनेक फलंदाजांनी इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारताचं इग्लंड दौऱ्यात काय होईल आणि कसं होईल? अशी भीती क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत या मालिकेत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करुन चाहत्यांची भीती खोटी ठरवली.

भारताच्या फलंदाजांनी या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये एकूण 12 शतकं झळकावली. भारताने यासह एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकांच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. भारतीय संघाआधी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 3 संघांनी एका मालिकेत प्रत्येकी 12 शतकं लगावली होती.

एका मालिकेत 12 शतकं

आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या 3 संघांनी एकाच मालिकेत प्रत्येकी 12 शतकं लगावली होती. ऑस्ट्रेलियाने 1955 साली वेस्ट इंडिज विरुद्ध, पाकिस्तानने 1982-83 मध्ये भारताविरुद्ध तर दक्षिण आफ्रिकेने 2003-2004 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यानंतर आता 22 वर्षांनी भारतीय संघाने 12 शतकांचा पाऊस पाडला.

कर्णधार शुबमनकडून सर्वाधिक शतकं

भारतीय संघासाठी इंग्लंड विरूद्धच्या सुरु असलेल्या या मालिकेत एकूण 6 फलंदाजांनी शतकं लगावली. यामध्ये कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी शतक ठोकलं. या मालिकेत सर्वाधिक 4 शतकं ही शुबमन गिल याने ठोकली. तर ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या तिघांनी प्रत्येकी 2-2 शतकं पूर्ण केली. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑलराउंडर जोडीने शतक करुन चौथा सामना हा बरोबरीत राखण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.

इंग्लंडला जशास तसं उत्तर

शुबमन, केएल, यशस्वी, ऋषभ, जडेजा आणि वॉशिंग्टन या फलंदाजांनी निर्णायक क्षणी शतक करुन इंग्लंडला जशास तस उत्तर दिलं आणि भारताला सामन्यात कायम ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावली. याच कामगिरीमुळे भारताने दुसऱ्या सामन्यात 336 धावांच्या ऐतिहासिक फरकाने विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात अवघ्या 22 धावांनी पराभूत व्हावं लागलं. तर चौथ्या सामन्यात जडेजा आणि सुंदर जोडीने शतकी खेळी करुन इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि सामना बरोबरीत राखला.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच