AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022 आधी पाकिस्तानी गोलंदाजाची फुकटची बडबड, विराट कोहलीला दिला सल्ला

Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तानचा सामना 28 ऑगस्टला होणार आहे. या मॅच मध्ये कोहलीचेही मैदानावर पुनरागमन होईल.

Asia Cup 2022 आधी पाकिस्तानी गोलंदाजाची फुकटची बडबड, विराट कोहलीला दिला सल्ला
ind vs pak Image Credit source: AFP
| Updated on: Aug 20, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई: माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून ब्रेक घेतला आहे. आशिया कप 2022 (Asia cup) मधून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना 28 ऑगस्टला होणार आहे. या मॅच मध्ये कोहलीचेही मैदानावर पुनरागमन होईल. मागच्यावर्षी कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून (Pakistan) पराभव झाला होता. सध्या कोहली फॉर्म मध्ये नाहीय. त्यांच्या बॅटमधून शेवटच शतक निघून 1 हजार पेक्षा जास्त दिवस झालेत.

कोहलीने फलंदाजीवर लक्ष द्यावं

कोहलीने शेवटच शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी सामन्यात झळकवलं होतं. कोहलीला आशिया कप मधून दमदार पुनरागमन करायचं आहे. चाहते सुद्धा त्याच्याकडून पाकिस्तान विरुद्ध शतकाची आस बाळगून आहेत. त्यासाठी कोहली सुद्धा मैदानात मेहनत घेतोय. कोहलीच्या या ब्रेकवर पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया उगाच नको तेवढ बोलला. “कोहलीने फॉर्म मध्ये परतण्यासाठी ही सीरीज खेळायला पाहिजे होती. आयपीएल मधून ब्रेक घ्यायला पाहिजे होता” असं कनेरिया म्हणाले. “मला वाटतं कोहलीला क्रिकेटवर फलंदाजीवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अजून काही वर्ष खेळायचं असेल, तर कामगिरीत सातत्य आवश्यक आहे” असे कनेरिया म्हणाले.

ब्रेक घेऊन कोहलीने चूक केली

दानिश कनेरिया यांच्यामते, कोहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून ब्रेक घेऊन चूक केली. “कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी काही आयपीएल सामन्यांवर पाणी सोडायला हवं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनुभवच त्याला फॉर्म परत मिळवून देऊ शकतो. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीज महत्त्वाची होती. त्याने खेळायला पाहिजे होतं” असं कनेरिया म्हणाले.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......