AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मध्ये भारतीय संघात ‘या’ खेळाडूंना संधी, संघ निवडीसाठी BCCI ची तारीख ठरली?

यंदाचा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. काही महिन्यांवर स्पर्धा येऊन ठेपली असल्याने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ संघ बांधणीला सुरुवात करणार आहे.

T20 World Cup मध्ये भारतीय संघात 'या' खेळाडूंना संधी, संघ निवडीसाठी BCCI ची तारीख ठरली?
भारतीय टी20 संघ
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केल्या होत्या. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी आयसीसीने सामन्यांंचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे आता सर्व संघ आपआपली रणनीती ठरवत असून संघ बांधणीलाही सुरुवात झाली आहे. भारताकडे सद्यस्थितीला चांगल्या दर्जाचे अनेक खेळाडू असून अंतिम 11 मध्ये कोणाला स्थान द्यायचं? हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) आहे. दरम्यान पुढील आठवड्याच या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण आगामी विश्वचषकासाठीच्या 18 खेळाडूंची निवड 10 सप्टेंबर पर्यंत करायची आहे. पण रिपोर्ट्सनुसार इंग्लंड विरुद्धची चौथी कसोटी संपल्यानंतरच संघनिवड होईल असं सांगण्यात आलं आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वरिष्ठ निवड समितीसोबत पुढील आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे 6 ते 7 सप्टेंबर रोजी बैठक होईल. ज्यावेळी संघ निवड केली जाईल. नियमांनुसार  आयसीसी स्पर्धांसाठी 15 मुख्य खेळाडूंसह 3 स्टँडबाय खेळाडू असा संघ निवडावा लागतो. त्यानुसार BCCI ला संघ निवडावा लागणार आहे.

‘या’ खेळाडूंवर खास नजर

टीम इंडियाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे असून रोहित शर्मा, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंची निवड जवळपास निश्चित आहे. पण शिखर धवन, पृथ्वी शॉ, मोहम्मद शमी, दीपक चाहर, युजवेंद्र चहल या खेळाडूंच्या निवडीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय श्रेयस अय्यर नुकताच दुखापतीतून सावरला असून त्याच्या निवडीवरही सगळ्यांचे लक्ष असेल. तसंच अष्टपैलू हार्दीक पंड्यालाही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने त्याची निवड होईल की नाही? हा प्रश्नही कायम आहे. पंड्याला सध्या शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर हे तगडे पर्याय उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या 

T20 World Cup Ind vs Pak : टी 20 च्या मैदानात सर्वात मोठा सामना, भारत वि पाकिस्तान मॅचचं टाईम टेबल जाहीर

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

(For ICC t20 world cup 2021 indian team selection on 6th or 7th september says reports)

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?