AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : गंभीर आणि सूर्या…, अभिषेक नायर नाव घेत स्पष्टच म्हणाला

India vs Pakistan : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. या सामन्याबाबत भारताची माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर काय म्हटलं? जाणून घ्या.

Asia Cup 2025 : गंभीर आणि सूर्या..., अभिषेक नायर नाव घेत स्पष्टच म्हणाला
Abhishek Nayar on Gautam Gambhir and Suryakumar YadavImage Credit source: PTI
| Updated on: Sep 12, 2025 | 5:49 PM
Share

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली. सूर्यकुमार यादव याची कर्णधार म्हणून आशिया कप स्पर्धेतील यूएई विरुद्धची पहिलीच वेळ होती. त्यामुळे सूर्यासमोर भारताला विजय मिळवून देण्याचं आव्हान होतं. सूर्याने हे आव्हान स्वीकारलं आणि भारताला विजयी सुरुवात मिळवून दिली. भारताने यूएई विरुद्ध मोठ्या फरकाने विजय साकारला. टीम इंडियाने यूएईला 57 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाने 58 धावांचं आव्हान हे 4.3 षटकांत 1 विकेट गमावून पूर्ण केलं. भारताने हा सामना 9 विकेट्स आणि 93 बॉल ठेवून जिंकला. टीम इंडियाचा या स्पर्धेतील दुसरा सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. भारतासमोर या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान असणार आहे.

भारताने पहिलाच सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. त्यामुळे सूर्यासेनेचा विश्वास दुणावला आहे. आता टीम इंडिया पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. भारताने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी असिस्टंट कोच अभिषेक नायर याने प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक नायर याच्यानुसार, यूएई विरूद्धच्या झटपट विजयामुळे टीम इंडियाला नुकसान झालंय. अभिषेक शर्माने नक्की काय म्हटलं आणि त्याला नक्की काय सांगायचं होतं? हे जाणून घेऊयात.

जर यूएई विरुद्धचा सामना थोड्या फार प्रमाणात आव्हानात्मक झाला असता तर भारताचा सराव झाला असता,असं मत अभिषेक नायर याने व्यक्त केलं आहे.

अभिषेक नायर काय म्हणाला?

“यूएई विरुद्धचा सामना आव्हानात्मक झाला असता तर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी चांगल्या प्रकारे सराव झाला असता. मात्र गौतम गंभीर आणि सूर्युकमार यादव यांनी सामना झटपट संपवण्याचा प्लान केला”, असं अभिषेक नायर याने म्हटलं. नायर आशिया कप स्पर्धेसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसह क्रिकेट एक्सपर्ट म्हणून जोडला गेला आहे. अभिषेकने या कार्यक्रमात बोलताना वरील प्रतिक्रिया दिली.

“चांगला सराव होण्यासाठी परिस्थितीशी एकरुप होणं गरजेचं असतं. मात्र हेड कोच गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांचा विजयासाठी खेळण्यासह सामना झटपट लवकर आटोपण्याचा प्रयत्न होता. मात्र सामना काही प्रमाणात आव्हानात्मक व्हायला पाहिजे होता. परिस्थिती बिकट असल्यावर चांगली तयारी होते”, असं अभिषेकने म्हटलं.

टीम इंडियाला आशिया कप जिंकायला हवा, असं न झाल्यास निश्चित काही तरी चुकीचं झालंय असा याचा अर्थ आहे, असं अभिषेक नायर याने म्हटलं.

“भारताकडे मजबूत संघ आहे. तसेच फिरकीपटू ज्या प्रकारे कामगिरी करत आहेत त्यानुसार या स्पर्धेत पराभूत होणं अवघड आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करत असतील तर विजेतेपद मिळवणं आणखी सोपं होतं. टीम इंडिया दावेदार नाही तर चॅम्पियन म्हणून दुबईला गेली आहे. टीम इंडिया या स्पर्धेत जिंकू शकली नाही तर निश्चित काही तरी चुकीचं झालंय”, असं अभिषेक नायर याने नमूद केलं.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत