AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघाचा खेळ सुधारण्यासाठी BCCI चा ‘हा’ निर्णय योग्यच, माजी भारतीय क्रिकेटपटूकडून कौतुक

भारतीय संघाने कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली 1983 साली विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. आजच्या घडीला भारतीय क्रिकेट संघ जगातील टॉपच्या संघामध्ये मोडतो.

भारतीय संघाचा खेळ सुधारण्यासाठी BCCI चा 'हा' निर्णय योग्यच, माजी भारतीय क्रिकेटपटूकडून कौतुक
BCCI
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 1:04 PM
Share

मुंबई : सर्वात आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगची (IPL) सुरुवात केली आणि जगभरातील देशांमध्ये क्रिकेट लीग्सचा जणू पुरत आला. प्रत्येक देशांनी त्यांच्या क्रिकेट लीग सुरु केल्या आहेत.  पण आजही सर्वात श्रीमंत लीग म्हणून आयपीएललाच ओळखलं जातं. पण अशातच बीसीसीआय भारतीय खेळाडूंना दुसऱ्या देशाच्या लीगमध्ये खेळायची परवानगी देत नसल्याने यावर अनेकजण प्रश्न उपस्थित करतात. पण भारताची माजी यष्टीरक्षक फलंदाज सबा करीमने (Saba Karim) बीसीसीआयचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचे सांगत त्याचे कारणही दिली आहे.

सबा करीम म्हणाल्या, ”बीसीसीआय आपल्या खेळाडूंना केवळ स्थानिक स्पर्धाच खेळू देत असल्याने खेळाडूंना तिन्ही प्रकारच्या फॉर्मेटसाठी चांगल्याप्रकारे तयार करत आहे. कारण काही देशाचे खेळाडू उदाहरणार्थ वेस्ट इंडीजचे खेळाडू देशभराती सर्व लीगमध्ये खेळतात. त्यामुळे देशाकडून खेळताना त्यांचा खेळ तितका खास नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंना केवळ भारतातील स्पर्धांमध्ये खेळू देण्याचा बीसीसीआयचा निर्णय खेळाडूंसाठीच फायद्याचा आहे.”

BCCI कडून देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रणजी करंडक स्पर्धेचा 2021-22 चे सत्र 5 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान खेळले जाईल. कोविड -19 च्या साथीमुळे गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले नव्हते. कारण 38 संघांसाठी बायो बबल तयार करण्यात ‘लॉजिस्टिक’ अडथळ्यांना सामोरे जावे लागले असते. बीसीसीआयच्या देशांतर्गत कॅलेंडरच्या या सत्रात रणजी ट्रॉफी खेळली जाईल. पण वरिष्ठ पुरुष क्रिकेटची सुरुवात 27 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडकाने होईल, जी सर्वोत्तम क्रिकेटपटूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग नंतर आयोजीत केली जाईल.

इतर बातम्या

VIDEO : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी साजरं केलं रक्षाबंधन, अर्जून तेंडुलकरने दिल्या मराठमोळ्या शुभेच्छा

इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो ‘Unlucky’, ‘हे’ आहे त्यामागील कारण

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

(Former indian player saba karim explains how bcci not allowing indian players to play in other countrys league is beneficial)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.