AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकपपूर्वी गोलंदाजांची धाकधूक वाढली, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर त्या नियमामुळे मोठं दडपण

आयपीएल स्पर्धेचा ज्वर आता खेळाडूंवर चढला आहे. मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे टी20 वर्ल्डकप स्पर्धेकडे.. या स्पर्धेत लागू होणाऱ्या नव्या नियमाबाबत धाकधूक वाढली आहे. कारण नव्या नियमामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर दडपण येणार आहे. विचार करण्यासाठी आता जास्तीचा वेळ मिळणार नाही.

वर्ल्डकपपूर्वी गोलंदाजांची धाकधूक वाढली, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर त्या नियमामुळे मोठं दडपण
Team India
| Updated on: Mar 15, 2024 | 5:32 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट झाल्यानंतर बराच वादंग झाला होता. फलंदाज मैदानात येण्यासाठीचा अवधी जास्त झाल्याने त्याला पंचांनी बाद केलं. त्यानंतर आयसीसी प्रशासन खडबडून जागं झालं. वेळेचं महत्त्व पटावं यासाठी आयसीसीने स्टॉप क्लॉक नियम लागू केला आहे. यासाठी डिसेंबर महिन्यापासून ट्रायल सुरु होती. आता हा नियम कायमस्वरूपी लागू होणार आहे. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला दोन षटकामधील अंतर पाळावं लागणार आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार आयसीसी हा नियम टी20 वर्ल्डकपपासून लागू करणार आहे. हा नियम टी20 सोबत वनडेतही लागू होणार आहे. नियमानुसार दोन षटकामधील अंतर हे 60 सेकंदाचं असणार आहे. म्हणजेच एका मिनिटाच्या आत दुसरं षटक सुरु करावं लागणार आहे. पहिलं षटक संपताच तिसरा पंच स्टॉप वॉच सुरु करणार आहे.

क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या नियमाचं पालन केलं नाही तर दंडाची तरतूद केली आहे. हा नियम लागू करण्याची जबाबदारी सर्वस्वी पंचांची असणार आहे. एखाद्या संघाने वेळेत षटक सुरु केलं नाही तर मैदानातील पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दोन वेळा समज देतील. त्यानंतरही नियमांच उल्लंघन झालं तर पाच धावांची पेनल्टी लावली जाईल. टायमर कधी सुरु करायचं हा निर्णय सर्वस्वी पंचांचा असणार आहे. डीआरएस किंवा इतर कारणामुळे वेळ होत असल्यास पंचांना थांबावं लागेल.

आयसीसीने हा नियम डिसेंबर 2023 मध्ये प्रायोगिक तत्वावर लागू केला होता. याची मर्यादा एप्रिल महिन्यात संपत आहे. हा नियम फायदेशीर असल्याचं आयसीसी आणि क्रिकेट कमिटीला लक्षात आलं आहे. त्यामुळे आता हा निर्णय कायमस्वरूपी लागू होणार आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, यासाठी आयसीसीच्या बैठका सुरु असून यात या नियमाला मंजुरी दिली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार असून अंतिम सामना 29 जूनला आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध 5 जूनला आहे. त्यानंतर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत सामना होणार आहे.

Follow Us
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....