AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir: गौतम गंभीर टीम इंडियाच्या निवडीबाबत काय म्हणाला?

Team India Head Coach Gautam Gambhir: माजी खेळाडू आणि वर्ल्ड कप विजेता दिग्गज गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यातून टीम इंडियाचा हेड कोच म्हणून पदभार स्वीकारणार आहे.

Gautam Gambhir: गौतम गंभीर टीम इंडियाच्या निवडीबाबत काय म्हणाला?
gautam gambhirImage Credit source: icc
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 17, 2024 | 12:51 AM
Share

टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता मुख्य संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर श्रीलंके विरुद्ध टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तिघे श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात या दौऱ्यातून टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. रोहितने टी 20I मधून निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाला या मालिकेतून पूर्ण वेळ कर्णधार मिळणार आहे. तसेच गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंके विरुद्ध नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. त्यामुळे टीम इंडियात एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. अशात आता गौतम गंभीरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. गंभीरने या व्हीडिओतून एक चांगली टीम कशी तयार केली जाऊ शकते, याबाबत म्हटलं. तसेच गंभीर आणखी काय काय म्हणाला हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

मॉर्डन क्रिकेटनुसार खेळण्यासाठी तसे खेळाडू हवेत, जे स्वाभाविकरित्या तसं खेळू शकतील. त्यांनी तसं खेळायला हवंच, यासाठी जबरदस्ती करणं योग्य नसल्याचं गंभीर 2023 मध्ये स्टार स्पोर्ट्ससह बोलताना म्हणाला होता.

गंभीर काय म्हणालेला?

तुम्हाला त्या हिशोबाने खेळणाऱ्या खेळाडूचा शोध घेणं गरजेचं आहे. असे खेळाडू हवेत, ज्यांनी नव्या पद्धतीने खेळणं आत्मसात केलं आहे. काही खेळाडू एकाच पद्धतीने खेळू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तसंच खेळायला हवं, यासाठी दबाव टाकण्यात अर्थ नाही. त्यांना आपल्याला अपेक्षित तसं खेळता येत नसावं. त्यामुळे माझ्यासाठी खेळाडूंची ताकद ओळखणं आणि तशी निवड करणं महत्त्वाचं आहे.

गौतम गंभीर काय म्हणालेला?

तसेच वनडे क्रिकेटसाठी सर्व प्रकारचे खेळाडू पाहिजे असतात. इथे एक बाजू लावून धरणारे आणि रनरेट धावता ठेवणारेही खेळाडूही हवेत. योग्य संतुलित टीम या क्रिकेट प्रकारची गरज असल्याचं गंभीरचं मत आहे. सर्वात आधी अशा खेळाडूंची पारख करण्याचं कौशल्य असायला हवं ज्यांच्यात निर्भीड खेळण्याची कुवत असेल, असं गंभीरने नमूद केलं.

Follow Us
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी