AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : गंभीर चुकलाच! वादळी शतक ठोकणाऱ्या युवराजच्या शिष्यालाही तो विसरला, हरभजन सिंह बरसला

Harbhajan Singh on Team India : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंह याने या निवडीबाबत बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. दोन खेळाडूंना संघात जागा न दिल्याने त्याने संताप व्यक्त केलाय.

IND vs SL : गंभीर चुकलाच! वादळी शतक ठोकणाऱ्या युवराजच्या शिष्यालाही तो विसरला, हरभजन सिंह बरसला
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 4:13 PM

बीसीसीआयने श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. कोचपदी गौतम गंभीरची निवड झाल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिला दौरा असणार आहे. गुरूवारी बीसीसीआयने टीमची घोषणा केली पण यामध्ये प्रतिभावान खेळाडूंना डावलण्यात आलंय. सर्वात मोठा बदल म्हणजे टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडसह एक असा खेळाडू आहे त्यालाही कोणत्याच टीममध्ये जागा मिळालेली नाही. तो जो खेळाडू आहे त्याच्यात संपूर्ण सामना पालटवण्याची क्षमता आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी झिम्बाव्बे दौऱ्यासाठी निवडलेल्या टीममधील स्फोटक खेळाडूची श्रीलंकेसाठी निवड केली गेली नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेक शर्मा आहे. अभिषेकने झिम्बाव्बे दौऱ्यामधील टी-20 सामन्यात वादळी शतक ठोकलं होतं. युवराज सिंहचा शिष्य असलेल्या अभिषेकला श्रीलंका दौऱ्यामधून वगळल्याने क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. हरभजन सिंहने अभिषेकसह टॉप स्पिनर युजवेंद्र चहल यालाही न घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

टीम इंडियामध्ये संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा यांची निवड का नाही झाली? हे समजणं कठीण असल्याचं हरभजन सिंहने म्हटलं आहे.  युजवेंद्र चहल तर वर्ल्ड कप टीममध्ये होता पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. तर संजू सॅमसन याला वन डे टीममध्ये घेतलं नाही तर अभिषेक शर्माला तर कोणत्याच टीममध्ये खेळण्याची संधी नाही.

श्रीलंकेसाठी भारताचा T20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

श्रीलंकेसाठी भारताचा T20 संघ :  सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नो, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज

अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू.
'त्या' 10 मिनिटांमुळे आज जिवंत, गुजरातच्या तरूणीनं सांगितलं काय घडलं?
'त्या' 10 मिनिटांमुळे आज जिवंत, गुजरातच्या तरूणीनं सांगितलं काय घडलं?.
PM मोदींनी अहमदाबादच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी अन्..
PM मोदींनी अहमदाबादच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी अन्...
एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर
एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग, मोठं कारण आलं समोर.
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...