AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : वनडे सीरिजमधून आऊट! टी 20i मालिकेत संधी नाही, हार्दिकचं करियर धोक्यात!

Hardik Pandya Team India : टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याच्या काही तासांनी अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे हार्दिकला टीम इंडियातून काही महिने बाहेर रहावं लागणार आहे.

Hardik Pandya : वनडे सीरिजमधून आऊट! टी 20i मालिकेत संधी नाही, हार्दिकचं करियर धोक्यात!
Hardik Pandya Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 12, 2026 | 9:02 PM
Share

बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांआधी आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह टी 20i टीमचा कर्णधारही बदलला. निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं. इतकंच नाही तर सूर्याला आगामी दोन्ही टी 20i मालिकांसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. सूर्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग नाही. त्यात टी 20i संघात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सूर्याचं आंतरराष्ट्रीय करियर संपल्याचं म्हटलं जात आहे. त्यात आता अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या कारकीर्दीवर सूर्याप्रमाणे टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे.

हार्दिकचं करियर धोक्यात

हार्दिक गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाकडून खेळलेला नाही. हार्दिक सूर्याप्रमाणे कसोटी संघाचा नियमित सदस्य नाही. मात्र हार्दिक एकदिवसीय आणि टी 20i क्रिकेटमध्ये सातत्याने खेळतोय. मात्र हार्दिक संध्या कोणत्याही फॉर्मेटमधील टीमचा भाग नाही. हार्दिकची सूर्याप्रमाणे आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी निवड करण्यात आलेली नाही. हार्दिक कसोटी संघाचा गेल्या अनेक वर्षांपासून भाग नाही. तर हार्दिकला 13 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे हार्दिकच्या करियरबाबत क्रिकेट चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

हार्दिक आणि कसोटी क्रिकेट

हार्दिकने 10 वर्षांआधी 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हार्दिकला दुसऱ्याच वर्षात 2017 कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तर हार्दिकने अखेरचा कसोटी सामना हा 2018 साली खेळला आहे. हार्दिकने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकासह एकूण 532 धावा केल्या आहेत. हार्दिक अशाप्रकारे गेल्या 8 वर्षांपासून कसोटी संघातून बाहेर आहे.

हार्दिक आणि वनडे क्रिकेट

टीम इंडियाने मार्च 2025 मध्ये न्यूझीलंडला अंतिम फेरीत पराभूत करुन चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. हार्दिकचा वनडे क्रिकेटमधील हा अखेरचा सामना होता. हार्दिकची अफगाणिस्तान विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली. मात्र हार्दिकला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. मात्र बीसीसीआयकडून हार्दिकच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बीसीसीआयने फिट असेल तरच खेळता येईल या अटीवर हार्दिकची अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड केली होती. त्यानुसार हार्दिक फिटनेस टेस्टमध्ये पास झाला. मात्र त्यानंतर काही तासांनी हार्दिक वनडे सीरिजमधून बाहेर झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र बीसीसीआयने हार्दिकबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र असं असलं तरी आता हार्दिक काही महिने टीम इंडियाच्या जर्सीत खेळताना दिसणार नाही.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ