
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आठ संघ पोहोचले आहेत. दोन गटात विभागणी झाली असून प्रत्येक गटात चार संघ आहे. गट 1 मध्ये भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ आहे. प्रत्येक गटातील संघाच्या वाटेला एकूण तीन सामने येणार आहे. हे सामने त्या गटातील संघाशी होणार आहे. जसं की भारताचे सामने झिम्बाव्बे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेशी होईल. प्रत्येक गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. त्यामुळे प्रत्येक संघाला उपांत्य फेरी गाठायची तर सुपर 8 फेरीत चांगली कामगिरी करणं भाग आहे. अन्यथा या स्पर्धेतील आव्हान सुपर 8 फेरीत संपुष्टात येईल. उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला तीन सामन्यात काय करावं लागेल? कोणतं समीकरण जुळून आलं तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल? ते जाणून घ्या.
भारतीय संघाचं एक उदाहरण घेऊयात. इतर संघांनाही ही समीकरण लागून पडणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर समोर दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचं आव्हान असणार आहे. या तीन संघांना भारताने पराभूत केलं तर उपांत्य फेरीचं तिकीट थेट मिळेल, यात काही शंका नाही. पण तीन पैकी एखाद दुसरा पराभव झाला तर मात्र कठीण होऊ शकते. दोन सामन्यात पराभव झाला तर गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे तसं समीकरण जुळून आलं तर काय?
भारताने तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर उर्वरित संघांचे गुण महत्त्वाचे असतील. टॉपला असलेल्या संघाने 3 सामने जिंकले असतील आणि भारताने 2 सामने जिंकले तर उपांत्य फेरीत भारताला स्थान मिळेल. यात काही शंका नाही. पण टॉपच्या संघानेही 2 सामने जिंकले असतील तर मात्र गणित गुणांपेक्षा नेट रनरेटच्या आधारावर जुळून येईल. कारण अशा स्थितीत तीन संघांचे गुण समान होतील आणि नेट रनरेटवरच गणित पुढे सरकेल. त्यामुळे भारताला नुसता विजय मिळवून नाही तर नेट रनरेटचं गणितही सांभाळावं लागणार आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार 21 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. पहिलाच सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला दक्षिण अफ्रिकेशी, 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेशी आणि तिसरा आणि शेवटचा सामना वेस्ट इंडिजशी 1 मार्चला होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 फेब्रुवारीला होतील. तर अंतिम सामना 8 मार्चला होणार आहे.