AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?

भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की द्वंद्व असतं. मग स्पर्धेचा निकाल काहीही असो.. या सामन्यात विजय मिळवला तरी दोन्ही देशाच्या क्रीडाप्रेमींचा जीव थंड होतो. या सामन्याचं किती वेड आहे हे दिसून येते. प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीवरून पुन्हा हे अधोरेखित झालं आहे.

भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?
भारत पाकिस्तान सामन्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचा विक्रम मोडला, नेमकं कारण काय?Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 20, 2026 | 5:47 PM
Share

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय दुरावा निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. तसेच पाकिस्तानला प्रत्येक पातळीवर धडा शिकवण्याचा निश्चय दिसत आहे. त्याची प्रचिती क्रिकेटच्या मैदानातही दिसून आली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सर्व सामने दुबईत झाले. त्यानंतर आशिया कप स्पर्धेत नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवली. हाच कित्ता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कायम आहे. असं असताना दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार म्हंटलं उत्साह शिगेला पोहोचणार यात काही शंका नाही. पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने भारताविरूद्ध खेळणार नाही असा पवित्रा घेतला आहे. बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे करत मोठा गाजावाजा केला होता. पण अखेर झुकले आणि भारताविरुद्ध सामना खेळले. आयसीसीच्या प्रयत्न यशस्वी ठरले आणि या सामन्याला मोठा प्रेक्षकवर्गही लाभला.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची अधिकृत डिजिटल आणि प्रसारण भागीदारी जिओस्टारकडे आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या पाच दिवसानंतर त्यांनी प्रेक्षकसंख्येची आकडेवारी जाहीर केली आहे. 15 फेब्रुवारीला पार पडलेल्या भारत पाकिस्तान सामन्याला डिजिटल आणि ऑनलाइन स्ट्रिमिंगद्वारे 16.3 कोटी प्रेक्षकसंख्या लाभली आहे. इतक्या लोकांनी हा सामना डिजिटल माध्यमातून पाहिल्याची नोंद झाली आहे. यात टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांची संख्या नाही. त्यात ही संख्या जोडली गेली तर आकडा अजून फुगेल यात काही शंका नाही. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतकी प्रेक्षकसंख्या लाभली नाही.

टी20 वर्ल्डकप अंतिम फेरीपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या डिजिटल माधम्यातून लाभल्याचं कंपनीने आकडेवारी जाहीर करताना सांगितलं. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. पण त्यापेक्षाही जास्त प्रेक्षकवर्ग आता लाभला. त्या सामन्याच्या तुलनेत 56 टक्के अधिक डिजिटल व्ह्यूज मिळाले.

पाकिस्तानच्या भूमिकेमुळे असं झालं का?

भारत पाकिस्तान सामना रद्द होणार अशीच स्थिती आधी होती. मात्र त्यानंतर आयसीसीने यशस्वी मध्यस्थी केली आणि सामना पार पडला. त्यानंतर लाभलेली डिजिटल प्रेक्षकवर्गाची संख्या पाहता नेमकं काय कारण असू शकतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ की पाकिस्तानचं बहिष्कार अस्त्र कामी आलं हे सांगणं कठीण आहे. वाढलेली संख्या ही पाकिस्तानच्या नाटकांमुळे झाली असावी असा अंदाज आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!