AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मोठ्या संकटात, बार्बाडोसमध्ये काय घडलं?

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने शनिवारी बार्बाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलाय. पण आता ते अडचणीत सापडले आहेत. टीम इंडिया मायदेशी कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. रिपोर्ट्सनुसार, जय शाह टीम इंडियाच्या आधी भारतात परतणार होते.

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मोठ्या संकटात, बार्बाडोसमध्ये काय घडलं?
Team India Won T20 World Cup 2024Image Credit source: PTI
| Updated on: Jul 02, 2024 | 8:01 AM
Share

बार्बाडोसच्या केंसिग्टन ओवल मैदानात टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलाय. बार्बाडोसची भूमी फक्त टीम इंडियाच नाही, त्यांच्या प्रत्येक चाहत्यासाठी खास बनलीय. याच बार्बाडोसमध्ये रोहित अँड कंपनीवर संकट कोसळलय. टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली आहे. याच कारण आहे, वादळ. बार्बाडोसला चक्रीवादळाने धडक दिली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू हॉटेल रुममध्ये कैद आहे. वादळामुळे बार्बाडोसमधली वीज आणि पाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एअर ट्रॅफिकही बंद आहे. रिपोर्ट्सनुसार बार्बाडोसमधून प्रत्येक उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

भारतीय टीम बार्बाडोसमध्ये फसली आहे. तिथून कधी परतणार? याची अजूनपर्यंत ठोस माहिती मिळालेली नाही. फक्त खेळाडूच नाही, बीसीसीआय सचिव जय शाह सुद्धा बार्बाडोसमध्ये आहेत. रिपोर्ट्सनुसार, जय शाह टीम इंडियाच्या आधी भारतात परतणार होते. पण बार्बाडोसमधील हवामान बदलल्यानंतर त्यांनी टीम सोबत तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

तिथल्या पत्रकारांनी काय माहिती दिली?

वेस्ट इंडिज दौऱ्यावर वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी गेलेले परदेशी आणि भारतीय पत्रकार सुद्धा तिथेच अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया सोमवारी सुद्धा बार्बाडोसमधून निघू शकली नाही. सध्या टीम इंडिया इथल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे.

बार्बाडोसमधून हरारेला कधी जाणार?

बार्बाडोसच वादळ शिवम दुबे आणि संजू सॅमसन दोघांसाठी जास्त तापदायक आहे. कारण दोघांना बार्बाडोसवरुन झिम्बाब्वेला जायच आहे. या दोघांची झिम्बाब्वे विरुद्धच्या पाच मॅचच्या T20 सीरीजसाठी टीममध्ये निवड झाली आहे. बार्बाडोसमध्ये अशीच स्थिती राहिली, तर हे दोघे कधी हरारेला जाणार. बार्बाडोसमध्ये हवामान सुधारेल आणि टीम इंडिया लवकरच मायदेशी परतेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश