मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या संक्रमणाचा काळ सुरु आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आता टी 20 मालिकांमध्ये फारसे दिसणार नाहीत. यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर वनडेमध्येही रोहित-विराट फारसे दिसणार नाहीत. याचं कारण आहे, त्यांचं वाढतं वयं. मागच्या 10 वर्षांपासून रोहित आणि विराट भारतीय क्रिकेटचे आंधारस्तंभ होते. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये टॉप 10 फलंदाजांमध्ये अजूनही त्यांचा समावेश होतो.